Sunday 27 January 2019

Line Cross करनी है क्या?

परवाच "नेटफ्लिक्स " वर "BAAZAAR" हा  हिंदी चित्रपट पाहिला। चित्रपटाची कथा ही तशी  टिपिकल हिंदी स्टाइल ची।  अलाहाबाद( योगींच्या  उत्तरप्रदेशमधील "प्रयागराज")  सारख्या छोट्या  शहरात वाढलेल्या  पण आभाळाची स्वप्ने पाहणारा "रिज़वान अहमद" हा तरुण  आणि  त्याचा खुदा म्हणजे "शगुन कोठारी ".  शेयर मार्केट व वित्त दुनियेचा जादूगार। डील मेकिंग आणि वेगवेगळ्या कंपनीच्या समभागांमध्ये  गुंतवणूक याच्या जोरावर प्रचंड पैसा नाव आणि दहशत (इज्जत नाही ) कमावलेला।  जीवनाला "१०० मीटर स्प्रिंट रेस " सारखे जगणारा आणि प्रत्येक व्यवहार  जिंकण्यासाठीच करताना साम दाम दंड भेद याचा खुबसुरतीने उपयोग करुन घेऊन फक्त यशश्वीच ठरलेला खिलाडी. आपले स्वप्न साकार करण्यासाठी हा होतकरू तरुण काय करतो , आपल्या खुदाला कसा भेटतो, त्याची इच्छापूर्ती होते की भ्रमनिरास , हा प्रवास म्हणजे "BAAZAAR".  मला चित्रपट आवडला।  सैफ अली खान ने "शगुन कोठारी " छान ताकदिने उभा केलाय( मला नेहमी वाटते की हा  नट कोटीच्या कोटी उड्डाणे घेऊ न शकल्याने " खाना"वळीच्या( खास  नाना पाटेकरांचा शब्द )  उतरंडीत मागे राहिलेला  , असो त्याविषयावर पुन्हा कधीतरी! ). रिज़वानला  मदत करणाऱ्या लोकांमध्ये  राधिका आपटेने रंगविलेल्या पात्राचे( प्रिया राय ) विशेष महत्व आहे। आपल्या खुदा बरोबर काम करण्याची संधि  की अलाहाबाद चे परतीचे  टिकट या व्दंव्द रेषेवर उभ्या असणाऱ्या रिज़वानाला प्रिया जो प्रश्न विचारते तो या चित्रपटाचा हाय लाइट आहे।  " Line Cross करनी है क्या ?"   

चित्रपट संपला। "विलेपार्ले उतरने वाले आगे आयो ", अशी हाक आली व मी बस मधून उतरून घरी गेलो।  एक प्रश्न मनात घर करूँन  राहिला होता तो म्हणजे " Line Cross करनी है क्या ?"

ती रेषा (Line) मला  जगण्याच्या  रणांगणावर  युद्धनीति( Strategy) अणि नीतियुद्ध ( Ethics, Compliance etc.) या मधील सीमारेषा वाटत आलेली आहे।  जीवन आनंदी करण्यासाठी माणसाने जो हा अखंड यज्ञ  चालविला आहे त्यात आहुती (Sacrifice) ही "तत्वांची (Principles) की स्वप्नांची (Dreams)" हे ठरवि ण ा री "Line of Control" वाटत आली आहे।

जानेवारी महिना सुरु झाला की राजकारणातील आणि  व्यापार ,अर्थकारणातील धुरीण  "दावोस " या स्विज़र्लंडमधील ठिकाणी जमतात।  पुढील वर्ष जगाच्या अर्थकारणासाठी कसे असेल , कुठला देश विकासाचा केंद्रबिंदु असेल किंवा कुठला देश, त्याची धोरणे जागतिक अर्थव्यवस्थेस अणि त्याच्या वाढीस खो घालु शकतील , माहिती & तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात होणारे बदल मानवी जीवन आणि रोजगार या गोष्टीशी कसे निगडित आहेत। अश्या वेगवेगळ्या विषयांवर परिसवांद असतात।   दरवर्षी भरणाऱ्या या वारीत वेगवेगळ्या तत्वप्रणालीचा  (ideology) बुक्का लावलेले शेकडो वारकरी आपली विचाररूपी कीर्तने करीत असतात।

भारताच्या बाबतीत बोलायचे झाले  तर  या  वार्षिक वारीतुन  आपल्या हाती लागले ते  आपल्याला खुप काही विचार करायला लावणारे आहे।  प्रथम  आनंदी गोष्टीने चालू करू।  २०१९ मध्ये भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीचा वेग हा जगात सर्वात जास्त म्हणजे  प्रतिवर्षी ७.५ %  इतका राहील।  धोरण सातत्य(Policy Continuity) जर राखले तर हाच वेग पुढचे काही वर्ष क़ायम राहण्याची दाट शक्यता आहे । हा देश जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे त्यामुळे याचे कौतुक थोड़े जास्तच।  पण विचार करायला लावणारी गोष्ट पुढे चालू होते।  भारतात मागील वर्ष निर्माण झालेल्या एकूण संपत्ती पैकी  देशातील ९९ % लोकांची संपत्ती  ३% वाढली अणि १% लोकांची सम्पति ४० % वाढली।  बर या विषमतेचा चटका जर अजून प्रखर करायचा असेल तर  थोड़े आकड्यात बोलूया।  २०१८ मध्ये १% भारतीय जनतेने  कमविलेल्या संपतीचा आकड़ा आहे  ३० लक्ष करोड़  आणि फेब्रुवारी मध्ये सादर होणाऱ्या मायबाप सरकारच्या अर्थसंकल्पचा आकड़ा आहे  २५ लक्ष करोड़। म्हणजे मनात आणले तर हे लोक सरकारला देश चालवायला लोन देऊ शकतात।  थोड़ी गंमत अजुन बाकि है मेरे दोस्त ! १% लोकांचे जर आणखी वर्गीकरण केले तर ऐसे दिसते की ९-१० लोकांची एकूण संपत्ति ६५ कोटी भारतीय लोकांच्या एकूण संपत्तिएवढी आहे।  वर्गवादाचा लढा जर कागदावर मांडायचा झ ाला तर तो ९ -१० विरुद्ध ६५ कोटी असा असेल।  तो चालू होणे हे पहिल्या आनंदी बातमीला घातक आहे.

या अर्थकारणाचे सामाजिक कंगोरे जर तपासले अणि या आर्थिक विषमतेचा जळजळीत पुरावा जर पाहिजे असेल तर आजच्या समाजकारणाकडे बघावे लागेल।  शेतकरी खुश नाही कारण त्याच्या मालाला चांगला ( माफक अपेक्षा काय तर भाव  हा निर्मितीच्या भावापेक्षा जास्त पाहिजे  ) भाव मिळत नाही।  कर्जमाफीने ही समस्या सुटेल असे  वाटत नाही  अणि तो एकच उपाय असेल तर सरकारलाही वर सांगितल्याप्रमाणे देश विकायला काढण्याखेरीज पर्याय नाही।  विकास हा  खर्चकपांत , यांत्रिकीकरण , उत्पादनक्षमता  या त्रिसूत्री वर आधारित आहे।   रोजगार निर्मिती जरी होत असली तरी ती पाहिजे त्या प्रमाणात आणि पाहिजे त्या किमतिला होताना दिसत नाही आहे।  यांत्रिकीकरण (Automation), कृत्रिम प्रज्ञा (Artificial Intelligence) या मुळे विकासदर  रोजगार वाढीस पूरकच ठरेल ही शक्यता धूसर आहे।

शेतीच्या प्रश्नाने ग्रामीण भारत उसासे टाकतों आहे  तर बेरोजगारीच्या चिंतने  नागरी तरुण ग्रस्त आहे।

 यातून "अस्मितांचे हुंकार  ", "जातिपातीचे राजकारण " आणि  "भावनांना साद घालणारी एकांगी टोकाची भूमिका"  आणि सर्व रोगावरचे एकच औषध  म्हणजे  " आरक्षण " असा समाजकारणाचा बाज बनला असताना " तडजोड ", " विसंवाद असताना चर्चा करण्याची मानसिकता " हा गुण  न रहता दुबलेपणाची निशानी झालेली आहे।

बर आरक्षण हा उपाय जर आपण योग्य ठरवून  काम चालू केले तरी परिस्थिती असी आहे की  रोजगार निर्मितीत सरकारी वाटा २% इतका  आणि भरतीची प्रक्रिया पण बेभरोश्याची।  अश्या वातावरणात आरक्षण म्हणजे "ओसाड गावची पाटीलकी नव्हे काय  ?"  खासगी उद्योगात  आरक्षण  हा  शब्द जरी उच्चा रला की  वरचे "दावोस" रूपी वारीतील वारकरी नाराजीचा सूर अळवतात।

अश्या वातावरणात "Line Cross करनी है क्या " हा यक्षप्रश्न  बनतो आहे।  इतिहास साक्ष आहे की जेव्हा जगण्याची लढाई लढली जाते तेव्हा युद्धनीतिच ( Strategy)  नीतियुद्धा वर  ( Ethics, Compliance etc.) हावी होते।  स्वप्नांसाठी(Dreams)  आहुती (Sacrifice) ही "तत्वांचीच  (Principles) दिली जाते।  विवेकानंद म्हणायचे की " धर्म हा भुकेल्यासाठी नाही "(Religion is not for empty Stomach).त्यात थोड़ा बदल करून असे म्हणेन की "तत्त्व ही भरल्या पोटीच बोलण्याची गोष्ट आहे। "

थोडक्यात काय सगळे संपले आहे की काय मुळीच नाही।  आपला दैदिप्तमान इतिहासच वाटाडया   होऊन आपणास मार्ग दाखवेल।

थोड़े मागे इतिहासात डोकावले तर याच सीमारेषेच्या दोहोबाजूस " व्यक्तिगत महत्वाकांक्षा " आणि " विश्वबंधुत्व " यांची रस्सीखेच चाललेली दिसून येईल। "  अवघे विश्वचि माझे घर " ऐसे म्हणत " Global Citizen" चा नारा देणारे संत ज्ञानेश्वर  आणि "अत्यंत क्रूरतेने साम्राज्य विस्तार करणारा विधिनिषेधशुन्य  "अल्लाउद्दीन खिल्जी " हे एकाच काळातले।

" एम्परर ऑफ़ वर्ल्ड " च्या व्यक्तिगत महत्वाकांक्षेने  जगाला विनाशाकडे नेणारे महायुध्य  लादणारा  " हिटलर " अणि "  स्वातंत्र ,समता , बंधुता , ( विविधेतेत )एकता   यांचा संदेश देणारा भारतीय स्वातंत्रसंग्राम " हे पण समकालीनच । स्वातंत्रसंग्रामाची सूत्रे "टिळकांकडून  गांधीकडे" गेल्या नंतर " व्यक्तिगत हेवेदावे  न मानता स्वातंत्र हे प्रथम उदीष्ट मानुन कार्य करणे आणि आपला वेगळा विचार व्यक्तिव्देषाच्या पातळीला जाउन  न देता  "केसरीतून " सम्पादकीयात   मांडत राहण्याचा " सुवर्णमध्य " साधणारे  न. ची. केळकर याच काळातले । " म्हटले तर बरोबर म्हटले तर चूक " हा  खास केळकरी वाक्प्रचार। तडजोड ही दुर्बलता नसून वाटा घाटी तील अस्त्र आहे  हे सुचविणारे ! आपल्या मनाप्रमाणे  झ ा ले नाही तरी "Line Cross" न करता मार्ग दाखविणारे कुणीतरी होते ही आशा पल्लवित करणारे  .

तिसरे म्हणजे " महाराष्ट्राचे पहिले मुख़्यमंत्री  श्री यशवंतराव चव्हाण साहेब ".  " बेरजेचे राजकारण " हा मराठीला त्यांनी बहाल केलेला शब्द।  राजकारण हे सर्वसमावेशक करण्यासाठी केलेला प्रयत्न  जो आज खुप जास्त गरजेचा  आहे।  अस्मितांचे हुंकार  ,जातिपातीचे राजकारण अणि भावनिक साद ही खुप गो ड वाटली तरी  अंतिमता हाती वजाबकिच येते हे दर्शवताना यशवंतराव आठवतात आणि मनाला आधार मिळतो की "बेरजेची भाषा करणारा कोणी तरी आपल्यातलाच होता  व पुढे पण होऊ शकतो।

"Line Cross करनी है क्या" हा प्रश्न विचारत फिरणाऱ्या व "Line Cross करनी है क्या"हा प्रश्न पडलेले अनेक तरुण तरुणी  असलेल्या या देशात "विश्वबंधुत्व", "सर्वसमावेशक विकास ", सुवर्णमध्य" साधण्याची मानसिकता असणारे धुरीण पण आहेत हीच काय  ती बेरजेची बाजू।



<a href="http://www.marathibloggers.net/" target="_blank"><img alt=" मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!" src="http://goo.gl/YckhY"></a>

Discover latest Indian Blogs
<a href="https://www.blogadda.com" title="Discover latest Indian Blogs"> <img src="https://www.blogadda.com/images/blogadda.png" width="80" height="15" border="0" alt="Discover latest Indian Blogs" /></a>



1 comment:

  प्रमुख  वक्ते : डॉ अजित वामन आपटे  शिक्षण :   B.A , M.P.M , D.M.M ,D.I.T.M , P.H.D (छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापनशैलीचा चिकित्सक ...