Saturday 19 January 2019

     द्रोणाचार्य  & आईपीएलची कार्टी !  


जानेवारी  महिना चालू झ ाला की  मजसारख्या परदेशी वित्त संस्थेमध्ये काम करणाऱ्या लोकांना वेध लागतात ते सरत्या वर्षाच्या कामगिरीचा आढावा घेऊन येणाऱ्या वर्षासाठी बाह्या सरसावून जोमाने ठरलेल्या ध्येय धोरणांनुसार कामाला लागण्याचे । सरत्या वर्षाच्या कामगिरीनुसार कमी अथवा अधिक होणाऱ्या पगार वाढीवर  मकर संक्रांतीचे तिळगुळ अणि गुळाची पोळी यांची गोड़ी कमी अधिक होते. जास्त पगारवाढीचा आनंद  किंवा कमी पगारवाढीसाठीचे उसासे  जानेवारीच्या गुलाबी थंडीत अनुभवणे  आता नित्याचेच। 

पण या वर्षी थोड्या अधिक कडाक्याच्या अणि जास्त लांबलेल्या  थंडीत बोचणाऱ्या तश्या बऱ्याच घटना आजूबाजूला घडल्या अणि नकळत  मनावर खोल ठसा  उमटुन  गेल्या।  या बोचणाऱ्या गोष्टीमध्ये दोन  ठळक  उल्लेख कराव्या अश्या घटना  म्हणजे  " रमाकांत आचरेकर " सरांचे निधन  व " Koffee with Karan" या गप्पांच्या (?) कार्यक्रमामध्ये हार्दिक पंड्या याने उधळलेली मुक्ताफळे !

भारतामध्ये माणूस  आयुष्यात   कोणीही असो  एक कुळधर्म  हा नित्यनेमाने पाळत  असतो। त्या कुळधर्मा चे  नाव म्हणजे "क्रिकेट ".  क्रिकेट हे वरकरणी  जरी ब्रिटिश राज्यसत्तेचे अपत्य असले तरी  हा  खेळ ब्रिटिशांना देखील खास भारतीय मातीत भारतीयांसाठीच सुचलेला असावा इतका तो या देशाच्या मातीत  व लोकांच्या मनात रुजलेला आहे।  या कुळधर्माचे कुळाचार म्हणजे क्रिकेटच्या होणाऱ्या मैचेस. त्या  पाहताना तन -मन -भान हारपून जाणाऱ्यां ची  संख्या निश्चितच कमी नाही इतका की हा खेळ मैदानी न राहता भावनिक कधी झ ाला हे पण कळले नाही। सामन्याच्या निकालानंतर सुख दुःख च्या हिंदोळ्यावर झुलणाऱ्या या कुळधर्मीयांचे कुळदैवत म्हणजे अर्थातच क्रिकेट खेळणारे खेळाडू आणि देवालये  म्हणजे  क्रिकेटची स्टेडियम्स। 

जसे हिन्दू धर्मामध्ये अनेक ईश्वरवाद असताना देखील काही देवतांचे स्थान "First Amongst Equals" म्हणतात तसे असते ना  त्या प्रमाणे  या कुलदेवतांचे।    क्रिकेट रूपी  धर्माच्या कुलाचाराचे  पालन  करताना प्रामुख्याने  कुलदेवताकडे जेव्हा मोर्चा वळतो तेव्हा प्रत्येक पिढीनुसार कुलदैवत बदललेले आपण पाहतो। हज़ारे ,मर्चंट ,मांजरेकर , पतौडी , वाडेकर , गावस्कर , कपिलदेव  असा प्रवास करत करत  तेंडुलकर ,द्रविड़ ,गांगुली ,धोनी  ते कोहली पर्यंत आपण  येऊन विसावतो। 

मी  ज्या  पिढीचा प्रतिनिधि आहे त्याचे कुलदैवत  हे  निश्चितच एक  अणि एकच होते।  ते म्हणजे "सचिन  रमेश  तेंडुलकर। "कारण  या देवाने जवळ जवळ दोन दशके आपल्या खेळाने आम्हा क्रिकेट धर्मीयाना मनमुराद आनंद तर दिलाच त्याबरोबर  रोजच्या  जगण्याच्या कटकटीतून ताजेतवाने होण्यासाठी विरंगुळा  पण मुबलक पुरविला। 

या कुलदेवाच्या जडणघडणीचे कार्यक्षेत्र म्हणजे "दादरचे शिवाजी पार्क " व  कुलदेवाचा मूर्तिकार म्हणजे " रमाकांत आचरेकर  सर ".  मातीच्या गोळ्याला आकार देऊन उत्तम शिल्प निर्माण करणाऱ्या शिल्पकाराप्रमाणे या माणसाने " सचिन रमेश तेंडुलकर " या वंडरबॉयला शब्द:श घडविले।  व  या शिल्पाने देखील  आपल्या  अंगभूत प्रतिभेने  आणि सरांच्या  मार्गदर्शनरूपी घडळावळीने  साऱ्या जगाला वेडे केले। 

आचरेकर सर यांनी  क्रिक्रेट मैदाने गाजविणाऱ्या नररत्नांची खाणच  उभी केली।  चंदू पंडित , प्रवीण अम्रे , अमोल मुजुमदार , वसीम जफ़र , विनोद  कांबळी  अणि अर्थातच सचिन तेंडुलकर  या त्यांच्या शिष्यांनी  रणजी , अंतरराष्ट्रीय  टेस्ट  अणि  एकदिवसीय सामन्यात भारताची पताका सदैव उंच फड़कत ठेवली। 

यशाची शिखरे पादाक्रांत करताना लागणारी शिस्त , संयम , क्रिकेटच्या परिभाषेत सांगायचे तर " Match Practice", " Practice Session (सराव शिबिरे ), मानसिक कणखरपणा (Big Match Temperament) यावर अधिक लक्ष्य केंद्रित व्हावे  म्हणून सरांचा सगळा भर हा  जास्तीतजास्त मैच खेळण्यावर असायचा।  नैसर्गिक शैली ( जरी ती पारंपारीक  क्रिकेटच्या टेक्सटबुकमध्ये बसत नसेल तरी )कायम ठेवून खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचे तंत्र म्हणजे  आजची "Focus on your Core strengths, to develop yourself into a formidable Force" ही "Management Philosophy" च नव्हे काय. हे करत असताना फाजिल कौतुक  हे सरांनी टाळलेच।  सराव  सामन्यात मुलगा लवकर बाद झाला तर सर स्वःत  त्याला स्कूटरवर बसवून दुसऱ्या ग्राउन्डवरील सामन्यासाठी घेऊन जायचे  जेणेकरून जास्तीतजास्त  सराव होईल। 

आयुष्यात  प्रत्येकवेळी आपल्या मनाप्रमाणे गोष्टी घडतात असे नाही पण त्या तश्या घडल्या नाहीत तर हताश/निराश न होता प्रयत्नवादी बनून धीराने संकटांचा सामना करत विजयपथाकड़े आगेकुच  करायची असते।  प्रत्येकवेळी मुठी वळवाव्यात असे वाटत असताना हाताची घडी घालण्यातच धन्यता मानावी लागते।  पण  अश्या परिस्थितीत नेटाने  काम करत " मुठी वळु शकतील " असा आत्मविश्वास देणारा नंदादीप  असणे महत्त्वाचे असते।  मला वाटते त्या नंदादीपाचे  मूर्तिमंत उदाहरण म्हणजे "आचरेकर सर। ".  

एखाद्या व्यक्तीने  एक-दोन स्पर्धात्मक परीक्षेत  किंवा गा ण्याच्या स्पर्धेत , खेळाच्या सामन्यात  यश मिळविले  की लगेच " उगवता तारा ," " लिटिल  चैंप्स " किंवा " आल राउंडर " अशी बिरुदे लावण्या च्या काळात    " १००  International Centuries & १००००  Test / १०००० one Day Runs" केलेला  जगप्रसिद्ध फलंदाज सरांच्या"Well-Played" या  कौतुकांच्या शब्दांसाठी आसुसलेला असायचा।  वर सरांना कोणी विचारले की सर म्हणायचे " एवढेच , अजुन केलेच  काय आहे त्याने , बराच लांबचा  पल्ला गा ठा यचा आहे ".  हे उत्तर  एकाचवेळी "खवचट पणा " आणि "शिष्याच्या प्रतिभेवरचा विश्वास "या सीमारेषेवर फिरणारे असायचे।  कदाचित हाच गुण त्यांच्या शिष्यांना जग जिंकण्यासाठी  सर्वस्व  पणाला लावण्याची जिद्द द्यायचा। 

याच तालमी मुळे असेल पण  जेव्हा  " खा उ  जा " ( खाजगीकरण , उदारीकरण , जागतिकीकरण ) संस्कृति  भारतामध्ये आली  आणि फोफावाली , तेव्हा  क्रिकेटच्या " खेळाचा " गेम  झाला।   भरपूर पैसा , जाहिरातीची उमेदवारी(endorsements)  या जोरावर क्रिकेटपटटूची  कोटीच्या कोटी उड्डाणे  चालू   झाली।  तेंडुलकर , कांबळी   ही त्या काळाची सर्वात ठळ कपणे  आठविणा री जोड़ी ("Nothing Official About It! म्हणून पेप्सिच्या जाहिरातीने घातलेला धुमाकुळ आ ठ वा ). , क्रिकेटच्या मैदानावर पण चांगलाच पराक्रम गाजवत होती। 
 पुढे क्रिकेट  हा  खेळा बरोबर एक " Event" पण झा ला।  याच  वृक्षा ला लागलेले फळ म्हणजे " Indian Premier League(IPL)."

साधारण याच काळात हिंदी सिनेमा पण कात टा कत  होता।  "कुछ कुछ होता है " म्हणत  भावनिक अणि कौटुम्बिक घडामोडींवर आधारित चकचकित सिनेमा आकारला येत होता।  काळाची पावले चंगळवादाकडे  अणि जागतिकीकरणाच्या वाटेवर चालली होती।  बरीच लोक नाके मुरडत असताना काळाची पावले ओळखुन  सिनेमा निर्मितीच्या क्षेत्रात एक तरुण उतरला होता।  त्याचे नाव " करण जोहर ".  आजच्या सिनेमात सहजतने आढळणारा " जाहिरातीचा भडिमार (Product placement) किंवा "associated marketing tie up"  याची मुहूर्तमेढ रोवली ती या तरुणच्या चित्रपटाने , "कुछ कुछ होता है" ने।  मुलांना लहान न समजता त्यांचे विश्व समझाऊंन घेऊन  त्यावर आधारलेले जाहिरात विश्व सुरु झ ा ले। 

तेव्हा हा करण जोहर जेव्हा "Koffe with Karan" या  कार्यक्रमासाठी दोन तरुण  व प्रतिभावान क्रिकेटपटूंना  बोलावितो याला महत्व दिले पाहिजे।  अर्थात कार्यक्रमाची पूर्वपीठिका लक्षात घेता ही मुलाखत गप्पांपेक्षा 3G( Gossip, Glamour & Grandeur) च्या मार्गाने जाणार हे ओघाने आलेच।  पण या मुलाखतीत चौथ्या G ( Girls) वर जी  प्रश्र -उत्तरे  आणि मुक्ताफळे उधळली गेली  ती  पाहता ह्या  4G Network ने  प्रेक्षकांच्या मनाची Range काही पकडली नाही।  तरुण असताना बंडखोर असण्यात काहीही चूक नाही। तारुण्यात रगेल आणि रंगेल असणे पण एक वेळ चालेल।  अंगात धमक असेल तर मस्ती जरूर करावी।  पण त्या रंगेलपणाची  जाहीर  वाच्यता करुन  "झाकली मूठ रीति च आहे " हे दाखवण्याचा हुंबपणा कशाला। 

मला खटकलेली एकच गोष्ट म्हणजे हे जे काही घडले ते क्रिकेटच्या कुळाचारला धरुन  नाही। क्रिकेटपटू हे लोकांसाठी आइडल असतात। सचिन आम्हाला "उतु नका मातु नका /घेतला वसा टा कू नका" असे  म्हणत जगण्याचे सूत्र सांगतो. तर धोनी  आम्हाला स्फूर्ति देतो की "छोट्या गावात जन्माला येऊन सुद्धा आभाळाची स्वप्ने बघता येतात। प्रतिभेने अणि प्रयत्नाने ती  सत्यात उतरवता येतात ". इ कडे  विराट  त्याच्या नैसर्गिक आक्रमक अन्दाजामध्ये जणू सांगतो आहे " आहात कुठे , चला जग जिंकूया ". दुर्दैवाने  हार्दिक अणि राहुल यांच्या कडून त्यांच्या बैडरूम मधील कौश्यल्याखेरीज घेण्यासारखे काहीच नाही  असे  वाटते। 

आता  BCCI, तरुण क्रिकेटपटूसाठी "Sensitization Session" घेणार  आहे त्यातून या तरुणांना  पैसा , प्रसिद्धी कशी हाताळायाची  आणि माध्यमांबरोबर संवाद कसा करायचा याचे धड़े देण्यात येतील।  काही आठवले का वाचकहो , " LIFE Coach" नेमणार आहेत। 

खरच आचरेकर सर ! तुमच्या सारख्या "LIFE Coach" ला  भारत कायमच मिस करेल।  तुमच्या स्मृतीस शत:श प्रणाम !


No comments:

Post a Comment

  प्रमुख  वक्ते : डॉ अजित वामन आपटे  शिक्षण :   B.A , M.P.M , D.M.M ,D.I.T.M , P.H.D (छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापनशैलीचा चिकित्सक ...