Saturday 25 January 2020

Image result for maratha tituka melvava logo                                                   जाणते काका अणि समर्थ रामदास 

नाटक  अणि राजकारण हे मराठी माणसाचे व्यवच्छेदक लक्षण मानले जाते। राजकारणातील नाट्य ( युती अणि आघाडीचे यशश्वी खेळ) मागचे ४ ते ५ महिने पूर्ण महाराष्ट्रने पाहिले। अस्सल नटाला लाजवतील अशा  भूमिका आपल्या पुढाऱ्यांनी वटविल्या।  युतीचा काडिमोड़ , आघाडीचे मनोमिलन , वैयक्तिक महत्त्वकांक्षा , रूसवे -फुगवे असे  रहस्य पटाला(Suspense Thriller) लागू होणारे सर्व काही त्यात  होते।  साहजिकच ती मोहिम फत्ते झाली असल्यामुळे कदाचित पुरोगामी मंडळी  आलेला शिणवठा घालविण्यात मग्न आहेत। 

"रयतेच्या भाजीच्या देठाला  धक्का लावू नका " अशी शिकवण देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेऊन सत्तेवर आलेले आघाडी सरकार लोककल्याणकारी  राज्य चालवित असल्याने कदाचित "अस्मानी " संकटातून सर्व मराठी जनांची मुक्तता झालेली दिसते। भूमिपुत्राच्या आत्महत्या एकाएकी थांबलेल्या आहेत। भाजीपाल्याचे  चढ़े दर  , उसाला ज्यादा हमीभाव , घोषित झालेली सरसकट कर्जमाफी यामुळे असेल कदाचित  निसर्गाच्या लहरीपणावर  वैतागलेला बळीराजा थोडा सुखी वाटतो आहे। "रस्त्यावरील शेवटच्या " माणसाला १० रुपयात जेवण मिळू लागले आहे। असे सगळे "करून दाखविले " असल्यामुळे  महाराष्ट्र सुस्तावला आहे। 

त्याच मुळे असेल कदाचित आता समस्त पुरोगामी मंडळींनी " सुलतानी" संकटाकडे मोर्चा वळविलेला दिसतो। नवनिर्माणाची हाक देणाऱ्यांना आता " महाराष्ट्र धर्म  अणि हिन्दवी स्वराज्य " याची भुरळ पडलेली दिसते , तर पूर्वाश्रमीचे हिंदुत्त्ववादी अणि  आता  नवपुरोगामी  "हिन्दुत्त्व हे काही येऱ्यागबाळ्याचे काम नव्हे , झेपत असेल तरच अंगावर घ्या " असा प्रेमाचा (?) सल्ला वडिलकीच्या नात्याने देत आहेत। या गदारोळात समस्त महाराष्ट्राचे काका , ज्यांना उभा महाराष्ट्र ( म्हणजे ४ जिल्हे ) जाणता राजा , कूटनीति तज्ञ म्हणून ओळखतो  यांनी पुन्हा एकदा इतिहासाचे अवलोकन करण्यासाठी  प्रयत्न चालू केले आहेत।  ज्यांच्या प्रेरणेने  हे लोककल्याणकारी  राज्य काका चालवित आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज, यांची प्रेरणा कोण होती तर त्यांच्या आई " जिजाबाई ". बाकी इतिहासरूपी नाटक लिहणारे जे लेखनीक आहेत त्यांनी उगाचच " समर्थ रामदास " वैगरे मंडळी श्रेय नामवली मध्ये घुसडली आहेत।  खरा इतिहास या पुरोगामी महाराष्ट्रासमोर येणे गरजेचे आहे। त्यामुळे " समर्थ रामदास " हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे राजकीय गुरु होते अशी श्रद्धा वैगरे असेल तर बाबांनो  जरा "सबुरीने घ्या ". कारण "इथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देशातील मराठी रक्ताशी गाठ आहे " असे सर्व सोमे गोमे ओरडून सांगत असतात त्यामुळे हे तपासायचे असेल तर "सावधानपण आणोनिया चित्ता " अशी भावना ठेवणे गरजेचे आहे। 

"टवाळे  आवडे विनोद " च्या धर्तीवर " कुचाळे आवडे समर्थ " असे म्हणणे क्रमप्राप्त आहे  कारण गेल्या १०० वर्षात त्यांच्या जीवनाविषयी ,  वैयक्तिक आयुष्यविषयी  इतक्या कुचाळ्या प्रचलित आहेत की तो एक विक्रमच ।  आजच्या " Millennial " जनरेशनला वाटेल  कोण हे "समर्थ रामदास " अणि काय वाद किंवा गोंधळ आहे हा तर त्यांच्यासाठी आजच्या भाषेत सांगायचे तर रामदास हे गेल्या १०० वर्षात आरोप हेत्वारोप यासाठी सोपे लक्ष्य(Soft Target) आहे कारण त्यांच्या आयुष्यात नाट्य आहे.   ते असे 

  • "शुभ मंगल सावधान " म्हणल्यावर  लग्न मंडपातुन बोहल्यावरून  काढलेला पळ 
  • " चिंता करितो विश्वाची " म्हणुन केलेली रामसाधना , १२ वर्षे देशभर प्रवास करून  जाणलेली त्यावेळेची परिस्थिति।  धर्मान्तर , पारतंत्र्य   याने पिचलेली प्रजा , अत्याचारामुळे घाबरलेल्या स्त्रिया आणि  देशमुखी किंवा सरदारकी सांभाळन्यात  गुंतलेले मराठी वीर।  
  •  " राम (आदर्श सांसारिक जीवनाचे टेम्पलेट ) अणि हनुमान ( ब्रम्हचारी अणि बलोपासना करणाऱ्या लोकांचे दैवत ) यांचे आदर्श घेऊन केलेली मठांची स्थापना, अस्मानी -सुलतानी संकटाला कंटाळलेल्या प्रजेला "जन बुडाले बुडाले " चा ठाहो फोडून प्रयत्नवादावर विश्वास ठेऊन प्रपंचात स्थिर होण्याचा उपदेश। परमार्थाकडून प्रवृत्तिमार्गाकडे वाटचाल करण्यासाठीचा पुरस्कार (देव पाहून घेईल पेक्षा मी प्रयत्न करतो ) 
  • यासाठीच  धर्मरक्षक अणि कल्याणकारी राज्य असले पाहिजे  म्हणून खटपट , ज्याचाच एक भाग म्हणजे शिवबाला अनुग्रह देऊन स्वराज्य स्थापनेच्या कामात प्रेरणा (यावरच वाद आहे )
असे सगळे "बातमीमूल्य (Story)" असलेले आयुष्य असल्यामुळे समर्थ  कुचाळीचे टार्गेट ठरणारच। 

समर्थांच्या संदर्भातील दोन आक्षेप म्हणजे 
  •   संतमालिकेत जिथे महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या नि अठरा पगड़  जातीतील संताना अधिकृतरित्या मानाचे स्थान आहे तिथे दासबोध कार अणि साक्षात्कारी समर्थांना  बहिष्कृत करण्यात आले आहे। 
  • शिवाजी  महाराजांनी  स्थापन केलेल्या स्वराज्या मागील प्रेरणा स्त्रोत समर्थ होते का।  ते छत्रपतींचे "राजकीय गुरु " (Political Advisor) का  "मोक्ष गुरु "( Spiritual Guide) असा एक जोडप्रश्न। त्यासाठी वादाचे हत्यार म्हणजे "समर्थ अणि छत्रपती यांची भेट व भेटीची वेळ " , ती शिवबाच्या १४वर्षी(१६४४) झाली का "स्वराज निर्मितीचे काम पूर्ण होत आलेले  असताना  शिवरायांच्या  ३९-४० व्या वर्षी(१६६९-१६७० ) झाली। 

संतमालिका अणि समर्थ :

संतमालिकेत जिथे महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या नि अठरा पगड़  जातीतील संताना अधिकृतरित्या मानाचे स्थान आहे तिथे दासबोध कार अणि साक्षात्कारी समर्थांना  बहिष्कृत करण्यात आले आहे याचे कारण म्हणजे 
  • वारकरी पंथा पेक्षा त्यांचा पंथ वेगळा होता। वारकरी पंथाचे दैवत "पांडुरंग " अणि समर्थ सम्प्रदायचे दैवत "रामचंद्र ". तसे पाहिले तर पांडुरंग किंवा रामचंद्र दोघे ही विष्णुचे अवतार अणि त्यामुळे त्यांचे भक्तगण वैष्णवच पण  या भक्तिमार्गाकडे घेऊन जाणाऱ्या वाटा वेगवेगळ्या। 
  • "मंजिल एक रास्ते अनेक " च्या धर्तीवर " पाण्डुरंगी दॄढ भावो " वर विश्वास ठेऊन चालणारा  वारकरी  अणि  प्रयत्नवादावर विश्वास ठेऊन प्रवृत्तिमार्गाकडे वाटचाल करणारा समर्थ सम्प्रदायी (देव पाहून घेईल पेक्षा मी प्रयत्न करतो ) , दोघेही शेवटी विष्णूच्या चरणी लीन होणारे वैष्णवच। 
  • संत विचारात प्रपंच्याच्या मिथ्यावर जास्त भर दिलेला असल्यामुळे त्यांच्या परमार्थ विचारात संसाराची अवहेलना अणि  निवृतिमार्गाची भलावण जास्त दिसते , या उलट अस्मानी -सुलतानी संकटाला कंटाळलेल्या प्रजेला "जन बुडाले बुडाले " चा ठाहो फोडून प्रयत्नवादावर विश्वास ठेऊन प्रपंचात स्थिर होण्याचा उपदेश करणारे प्रवृत्तिमार्गी संत म्हणजे समर्थ। 
  • एकाचा निवृत्ति मार्ग अणि एकाचा प्रवृत्ति मार्ग , त्यामुळे अर्थातच समर्थ संत कुळापासून दुरावले। 
  • हे कमी म्हणून की काय  " चाय से ज्यादा  किटली गरम " या न्यायाने समर्थ साहित्याचा अभ्यास करणारे इतिहास तज्ञ  वारकरी संताना "संताळे " म्हणून हिणवू लागले त्याचा वचपा  काही जातीयवादी अणि अशा इतिहास  तज्ञांचे विरोधक यांनी मग समर्थांना छत्रपतींचे  "मोक्ष गुरु "( Spiritual Guide) करून  स्वराज्य स्थापनेतील त्यांचे योगदान पुसण्याचे प्रयत्न चालविले। 
  • खरे बघितले तर तुकोबा(संत मालिकेतील ) अणि समर्थ या शिवकालीन संतांचे उत्तम संबंध होते।  शिवाजीराजे मार्गदर्शनासाठी तुकोबांकडे  गेले असता त्यांनी सरळ उपदेश केला तो असा "शरण असावे रामदासालागी।नमन साष्टांगी घाली त्यासी "
हे सर्व पाहिल्यावर साहजिकच प्रश्न पडतो की  याच्यात वाद तो काय।  याचे सोपे उत्तर म्हणजे "आपला नामस्मरणाचा रोग ". ताणतणाव अणि संकटांनी भरलेल्या आयुष्यात विसाव्यासाठी , आपल्या पाठीमागे कोणी आहे  असा विश्वास देणारे कोणी तरी असावे असे वाटणे चुकीचे नक्कीच नाही। "पांडुरंगी दॄढ भावो " या तत्त्वा प्रमाणे तो आधार "देव " नावाच्या संकल्पनेमध्ये पाहणे हे स्वाभाविक आहे , तिथे पोचण्याचा मार्ग म्हणजे भक्ति / नामस्मरण/सेवा इ।  Action(कृति ) पेक्षा Attention ( देव पाहून घेईल) वर  भरोसा  असलेला असा भाबडा भाविक  म्हणजे त्या मार्गावरून देवभेटीचा अनुभव  किंवा जीवनाचा अर्थ वैगरे समजून  घेताना प्रयत्नवादावर विश्वास ठेऊन प्रवृत्तिमार्गाकडे वाटचाल करा असे सांगणाऱ्या समर्थांना  "Follow " करणे शक्य नाही।  त्याला साहजिकच वारकरी पंथाचा निवृतिमार्ग जास्त भावतो। कारण त्यात एक "Romanticism" आहे। 

साधारणत: एवढी मोठी व्यापकता  असल्यानंतर  संख्या ( Stats ) & विदा( Data )  शास्त्राच्या नियमानुसार त्याचे वर्गीकरण केले जाते।  ते करताना त्याला समूहामध्ये( Cohort ) कैद केले जाते। तसे करताना या समूहाकड़े  एक तर ग्राहक  म्हणून बघितले जाते किंवा  मतदार म्हणून अमिष दाखविले जाते।  बाजारपेठ  अणि निवडणूक प्रक्रियेत अनिवार्य असणारे वर्गीकरण कूपे ( Classification Buckets) मग या वारकरी पंथाला पण लागु होतात  व त्याला   आचार -विचार , आवडी -निवडी , खान-पान या  सोप्या , सुलभ घटकांमध्ये बंदिस्त करतात।  यातून  निवडणुकीत आपला विचार आपल्या मतदात्यापर्यंत पोहचविणे कदाचित सोपे जाते।  अणि राजकारणात ( विरोधाभास बघा , राजकारण हा शब्द समर्थांनी  पहिल्यांदा मराठीत रूढ़ केला ) संख्या शात्र्यावर  भर असल्यामुळे मग असे वाद , अशा  भूमिका फायद्याच्या ठरतात। कूटनीति तज्ञ काका याला अपवाद कसे असतील। 

राजकीय गुरु (Political Advisor) Vs मोक्ष गुरु ( Spiritual Guide):

शिवाजी  महाराजांनी  स्थापन केलेल्या स्वराज्या मागील प्रेरणा स्त्रोत समर्थ होते का  हा दूसरा वादाचा मुद्दा। वर सांगितल्या प्रमाणे समर्थ साहित्याचा अभ्यास करणारे इतिहास तज्ञ  वारकरी संताना "संताळे " म्हणून हिणवू लागले त्याचा वचपा  काही जातीयवादी अणि अशा इतिहास  तज्ञांचे विरोधक यांनी मग समर्थांना छत्रपतींचे  "मोक्ष गुरु "( Spiritual Guide) करून  स्वराज्य स्थापनेतील त्यांचे योगदान पुसण्याचे प्रयत्न चालविले।  या वादाचे हत्यार होते "समर्थ अणि छत्रपती यांची भेट व भेटीची वेळ"

पहिला मत प्रवाह 

समर्थ अणि छत्रपती यांची भेट  शिवबाच्या १४-१५ वर्षी(१६४४-४५ ) मसूर (सध्या जे गाव अख्खा मसूर अणि रोटी साठी फेमस आहे ते ) येथे रामनवमीच्या उत्सवात झाली।  समर्थ १२ वर्षे भारत भ्रमण करून  कृष्णा तीरी  परतल्यावर राम अणि हनुमान यांची  उपासना व बलोपासना  यांचा प्रचार करून धर्मान्तर , पारतंत्र्य  याने पिचलेली प्रजा , अत्याचारामुळे घाबरलेल्या स्त्रिया यांना प्रयत्नवादावर विश्वास ठेऊन प्रपंचात स्थिर होण्याचा उपदेश करत होते। पुढे १६५०-१६५१ (शिवबा : वय :१९-२० वर्षे ) मध्ये शिंगणवाडी (चाफळ जवळ ) येथे   समर्थांनी शिवबाला राजधर्म किंवा क्षात्रधर्म सांगितला। स्वराज्य स्थापनेच्या कामी मदत केली।

याचा पुरावा म्हणून "समर्थ वाकेनिशी "(Daily diary  किंवा हकिगतीचे टिपण )  किंवा "हनुमंत स्वामी हे जे समर्थ अनुयायी होते त्यांची बखर " मल्हार रामराव चिटनीस कृत "शिवचरित्र " असे दिले जातात ज्यामध्ये " वैशाख शुद्ध द्वितीयेला " शिंगणवाडी येथे अनुग्रह दिला।  त्यावेळचे  ओवीबद्ध पत्र (१६४९  )म्हणजे

"निश्चयाचा महामेरु / बहुत जनास आधारु 
अखंड स्थितीचा निर्धारु /श्रीमंत योगी //"

याच पत्रात समर्थ म्हणतात " तुमचे देशी वास्तव्य केले /परंतु वर्तमान नाही घेतले " याचा अर्थ "एकाच प्रांतात काम करत असताना देखील तुमची भेट प्रत्यक्ष घेतली नाही। " याला उत्तर म्हणून शिवाजी राजे लिहतात
"दर्शनाच्या अपेक्षेने येत आहे कृपा करू दर्शन दिले  पाहिजे। "  हे पत्र अणि शिवबा एकाच वेळी समर्थांच्या भेटीला पोचतात। १६५०-५१ मध्ये समर्थांनी शिवबाला राजधर्म किंवा क्षात्रधर्म सांगितला, अनुग्रह दिला।  पुढे १६५६ मध्ये प्रतापगड बांधून झाल्यावर  भवानी देवीच्या मूर्ती स्थापनेचा सोहळा झाला।  समर्थांनी  त्याला हजर राहून  देवीला जी प्रार्थना अर्पण केली  ती म्हणजे "एकचि मागने आता द्यावे ते मजकरणे।  तुझाचि वाढवी राजा शीघ्र आम्हांसी देखता " याचा अर्थ सरळ आहे की " ह्या तुझ्या शिवाजीराज्याला आमच्या देखत लौकर वाढवून तू मोठा कर। "

पुढे समर्थांचे  स्वराज निर्मितीतील योगदान  अणि उपदेश  एका वाक्यात  सांगायचे म्हणजे

"मराठा तितुका मेळवावा / महाराष्ट्र धर्म वाढवावा। " हे ब्रीदवाक्य।

यातील मराठा  म्हणजे " महाराष्ट्रातील प्रजा/ हिन्दू लोक  " अणि " महाराष्ट्र धर्म/हिन्दू धर्म  म्हणजे  न्याय अणि सत्यावर चालणारा कल्याणकारी राजधर्म "

दूसरा मत प्रवाह 

समर्थ अणि छत्रपती यांची भेट "स्वराज निर्मितीचे काम पूर्ण होत आलेले  असताना  शिवरायांच्या  ३९-४० व्या वर्षी(१६६९-१६७० ) झाली। याचा अर्थ शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्थापनेचे काम पूर्ण होत  आलेले होते अणि त्यात समर्थ रामदास यांचा सहभाग नव्हता। ते फक्त शिवाजी महाराजांचे मोक्ष गुरु ( Spiritual Guide) ठरतात। 

याचा पुरावा म्हणून  समर्थ भक्त  दिवाकर गोसावी याने केशव गोसावी यास पाठविलेले पत्र। ते  पत्र  म्हणजे

"राजेश्री शिवराजे भोसले हे समर्थांच्या भेटीस येणार म्हणोन लिहिले ते समजले।  मी येणार होतो परंतु माझी प्रकृती फार बिघडली असल्यामुळे मी  अकास (समर्थ शिष्य )येणे साठी लिहिले परन्तु अका चेही एने व्हावयाचे नाही।  गावी भानजी गोसावी असतील  राजे यांची पहिलीच भेट आहे।  वाडीचे लोकास खटपटेत आणावे उपयोग होईल , झाड़ी बहोत आहे।  लोभ करावा। "(चैत्र वदय द्वितीया १६७० )

राजे यांची पहिलीच भेट आहे   एका वाक्यावर हा मतप्रवाह अवलंबिलेला आहे की राजे अणि समर्थ हे प्रथम १६७० (शिवबा : वय :४० वर्षे ) भेटले।  इतिहास ज्यांना महित आहे त्यांना  कळेल  की  राज्य स्थापनेचे  काम जवळ जवळ पूर्ण झाले होते त्यामुळे "राजकीय गुरु " या उपाधिला समर्थ आपोआप च मुकतात।

कूटनीति तज्ञ काका यांचा या दुसऱ्या मतप्रवाहावर विश्वास आहे  त्याचे कितीही कमी पुरावे असले तरी कारण सरळ आहे। 

"मराठा तितुका मेळवावा / महाराष्ट्र धर्म वाढवावा" म्हणणारे समर्थ  " हिन्दू लोकांना एकत्र करा , महाराष्ट्र धर्म म्हणजे स्वधर्म वाढवा असे सांगत आहेत।  सेक्युलर काका त्याला कशी मान्यता देतील ,, ते त्यांच्या "Electoral  Arithmetic " मध्ये  बसणार नाही त्यामुळे अर्थातच शिवाजी महाराजांचे मोक्ष गुरु समर्थ म्हणणे फायद्याचे।

उगाच काही समर्थ प्रेमी (माझ्यासारखे ) काकांना   "जातीयवादी " वैगरे ठरवितात ते   बरोबर नाही कारण समर्थांवर टिका करून  जर मतपेटी बलवान होत असेल तर ते क्षम्य नाही का।

शेवटी काय

"इथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देशातील मराठी रक्ताशी गाठ आहे " असे ओरडून सांगणारे सोमे गोमे अणि  प्रयत्नवादावर विश्वास ठेऊन प्रवृत्तिमार्गाकडे जाण्यापेक्षा पांडुरंगी दॄढ भावो म्हणत नामस्मरणावर  विश्वास असणारे मतदाता हाच तर कूटनीति तज्ञ , जाणते राजे काका यांचा "Target Audience" , त्यामुळे समर्थांचे अस्तित्व नाकारणे  ही एक अगतिकता  दूसरे काय। 

Saturday 18 January 2020


हिन्दू पद पादशाही  : पानिपत & Beyond

Image result for maratha warriorनवीन दशक चालू होण्याच्या उंबरठयावर  जे अनेक बदल आपण पाहतो आहोत त्यातील सर्वात मोठा बदल   म्हणजे  गेल्या दशकातील तंत्रज्ञानाने  उत्तम सेवा( Excellent Customer  Service ) देणारी संसाधने( Resources )  हाती दिल्यानंतर माणसाचा प्रवास हा ते वापरून आपले जीवन समृद्ध करण्याकडे चाललेला दिसतो।  त्यातील परवालीचा शब्द म्हणजे जीवनाभुव ( Life Experiences  ). मग तो घेतलेला नवीन मोबाइल असो किंवा केलेली एखादी ट्रिप असो।  तो अनुभव ही जगण्याच्या प्रवासातील शिदोरी बनते ।  कधी ती माणूस म्हणून आपल्याला समृद्ध करते, आनंदित करते  तर कधी  कटू आठवणी देते, मनात खंत निर्माण करते ।  ही जी मनाला खात राहणारी खंत आहे ना ती जशी वैयक्तिक असते तशीच ती एखाद्या समाजाची किंवा समुहाची पण असते।  " छत्रपती  शिवाजी महाराज" यांच्या सारख्या  विभूतीचे नाव जरी उच्चारले तरी गर्वाने खुलणारा आपला मर्द मराठी माणूस  अशीच एक खंत गेली  जवळजवळ अडीच (२. ५ ) शतके (२५९ वर्षे ) आपल्या उराशी बाळगून आहे ती म्हणजे "१४ जानेवारी १७६१ साली झालेले  पानिपतचे युद्ध अणि  त्यातील आपला (मराठ्यांचा )पराभव।"

तो पराभव  म्हणजे 

  •  छत्रपतींच्या प्रेरणेने आणि  त्यांनी लावलेल्या "स्वराज्याच्या " रोपट्याचे वटवृक्षात(साम्राज्यात ) रूपांतर करून , अटकेपार झेंडे फड़काविणाऱ्या ( पंजाब / लाहोर ताब्यात घेऊन दुर्रानी फौजेला काबुलकड़े  पळण्यासाठी भाग पाडणाऱ्या) व संपूर्ण मुघल भारतात ( राजपुताना , माळवा  , गुजरात , आग्रा , अजमेर )चौथाईचे / महसूल गोळा करण्याचे हक्क प्रस्थापित केलेल्या मराठ्यांचे  "ईराणच्या पातशाहीची "मदत घेऊन काबुल अणि कंदहार ताब्यात घेण्याचे (दुर्रानी घराणे संपविण्याचे  ) मनसुबे धुळीला मिळविणारा 
  • आर्थिक आघाडीवर थकविणारा ( काही कोटी रुपयांचे कर्ज
  • मराठा साम्राज्याची  (थोड्याकाळासाठी) घडी विस्कटणारा 
  • आजच्या भाषेत बोलायचे झाले तर "Demographic Dividend " ( तरुण लढवय्ये, साहसी सरदार , भावी पेशवा  अणि ७००००+ अधिक लोक या लढाईत मारले गेले  ) उद्ध्वस्त करणारा हा पराजय होता।
  •  "जिहाद " ही संज्ञा वापरून  झालेली पहिली हिन्दू-मुस्लिम लढाई ज्या मध्ये हिन्दू सरदार (मराठे) दिल्लीच्या तख्तासाठी (मुसलमान बादशहाच्या रक्षणासाठी की मातृभूमीच्या रक्षणासाठी) परकीय मुसलमान आक्रमकांसोबत  (अफगान दुर्रानी , रोहिल्ला ) लढले होते।
अशी भौगोलिक ,आर्थिक ,राजकीय अणि धार्मिक कंगोरे असलेली इतिहासातील ती बहुदा पहिलीच मोठी लढाई

अशी दुःखे  किंवा मनाला लागलेली टोचणी  / खंत आपल्याबरोबर एक भाबडी आशा घेऊन येते। जी आशा शक्याशक्यतेच्या हिंडोळ्यावर आपल्याला झुलायला लावते। अमुक केले असते तर कदाचित तमुक झाले असते असे गणिती समीकरण मांडून इतिहास कदाचित वेगळा असता अशी वेडी उम्मीद जागवते । याच समीकरण मांडणीत मग घडलेल्या घटनांचा परामर्श घेतला जातो। लढाईची परिस्थिति, त्यातील मोहरे , डावपेच , नेतृत्व यांचे  सविस्तर विश्लेषण  करून  वेगवेगळे निष्कर्ष काढले जातात। ते मला अत्यंत महत्त्वाचे वाटते कारण त्याने जरी इतिहास बदलणार नसला तरी झालेल्या चूका , चुकलेले डावपेच   याचे नेमके आकलन होते अणि भविष्यात तशा  चूका  पुन्हा होणार नाहीत याची काळजी घेता येते। कारण  विस्टन चर्चिलने म्हटल्याप्रमाणे " Longer you look back, farther you can look forward."

तसे पाहिले तर ही  ऐतिहासिक घटना  आणि आजचे आपले  जीवन ,उद्योग  यात काय  संबंध।  त्यातील घटना आजच्या व्यवस्थापकीय रचनेसाठी ( Modern Management) खूप काही धड़े , शिकवण समोर ठेवते।   कारण शेवटी काळ बदलला तरी " जिंकणे अणि त्यासाठी शत्रूचा पराभव करणे " हेच समान सूत्र आहे।  आजच्या व्यवस्थापकीय रचनेचा पायाच यावर रचला केला आहे।  त्यामुळेच  या रचनेत  " Battle Field ", "Logistics ", " Leading  by  Example", " Personality  Cult / Character " , " Territorial gains( Market  Share)  या सारखे शब्द  येतातच ।

व्यवसाय नियोजन अणि विस्तारीकरण( Business Management & Expansion ) करताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत अणि कोणत्या गोष्टींचे अनुकरण केले पाहिजे याचा ऊहापोह करते।त्याकडे वळण्यापूर्वी  प्रथम या लढाईची पार्श्वभूमी  विचारात घेणे तितकेच गरजेचे आहे ( घाबरू नका " पानिपत घडण्याची ५ कारणे सांगा " या सारख्या शालेय इतिहासाच्या पेपरातील  प्रश्न मी नक्कीच तुमच्या समोर मांडणार नाही।  चिंता नसावी )

त्याची पार्श्वभूमी दडली आहे ती " राघोबा दादा( रघुनाथराव )  यांची मल्हारराव होळकर अणि दत्ताजी शिंदे यांच्या साथीने उत्तरेतील  साम्राज्य विस्ताराची मोहिम ( Northern expedition  १७५७ -१७५८ )ज्यामध्ये  मुघल बादशहाचे रक्षक म्हणून प्रथम केलेला नजीब खान रोहिल्याचा पराभव ( मीर बक्षी* होण्याची त्याचे मनसूबे धुळीला मिळविणारा  ) अणि अफगाण आक्रमणापासून केलेले दिल्लीचे संरक्षण।  त्यापुढे या शूर वीरांनी मारलेली पंजाब अणि लाहोर प्रांतातील मुसण्डी( अटकेपार झेंडा याच मोहिमेची फलश्रुती )।  एकीकडे नजीब खानाला त्याची जागा दाखवून देतानाच दुसरीकडे अहमद शाह अब्दालीच्या मुलाचा  (तैमूर खानचा  ) केलेला पराभव व दुर्रानी फौजांनी काढलेला पळ। याचे नैसर्गिक  परिणाम म्हणजे बदला घेण्यासाठी टिपलेले दुर्रानी अणि रोहिले। या दिग्विजयाततील  काही अडचणी  , आखलेले मुस्सदी डावपेच उलगडणे तितकेच गरजेचे  । या मोहिमेसाठी लागणारी आर्थिक कुमक जमविताना  राघोबा दादांना आलेल्या अडचणी , राजपुताना प्रदेशात लूट करून करावी लागलेली सैन्याची व्यवस्था, ती  सोय लावण्यासाठी वेळोवेळी जाट लोकांशी अणि राजपूत लोकांशी झालेल्या झटपटी  जेणेकरून लढणारे सैनिक उपाशी राहणार नाहीत  . ही सोय लावत असतानाच ज्याला आपण मुस्सदी डावपेच म्हणतो तो म्हणजे अवधचा नवाब "सिजा उद दौला " याने घेतलेला तटस्थ राहण्याचा घेतलेला निर्णय ज्यामुळे नजीब  खान रोहिल्याची गंगा यमुना दोआब भागात मराठे लोकांना करता आलेली कोंडी। या दिग्विजयानंतर मुग़ल भारतात उठलेली आवई ती म्हणजे " विश्वासराव "ला नानासाहेब पेशवा दिल्लीच्या गादीवर बसविणार बादशाह म्हणून ।
*(मीर बक्षी: Paymaster  General / Commander in Chief)

यातूनच  पानिपतच्या लढाईची बीजे रोवली गेली  ती अशी
  • रोहिले अणि दुर्रानी यांच्यातील  मराठ्यांबद्दलची बदल्याची भावना 
  • हिन्दू पद पादशाही (" विश्वासराव "ला नानासाहेब पेशवा दिल्लीच्या गादीवर बादशाह म्हणून नेमणार) या  पहिल्या बाजीरावाच्या स्वप्नाची पूर्ति होणार या भीतीने मुस्लिम मुस्सदी अणि धर्मगुरु यांनी दिलेली इस्लाम खतरेमें ची  हाक अणि दुर्रानी राजाला (अहमद शाह अब्दालीला ) धर्म वाचविण्यासाठी केलेली विनंती 
  •  मराठे दिल्लीच्या गादीवर बसले  तर आपल्याला जास्त  चौथाई/महसूल द्यावा लागेल या भीतीपोटी विरोधात गेलेले जाट, गुर्जर  & तटस्थ  राहिलेले राजपूत 
  • इस्लाम खतरेमें च्या नावाखाली "जिहाद " पुकारून अवधचा नवाब "सिजा उद दौला " या शिया मुस्लिम प्रशासकाला  आपल्या बाजूने वळविणारी नजीब खान रोहिला  या सुन्नी मुस्लिम सेनानीची मुस्सदेगिरी
आता लढाईची पार्श्वभूमी समजल्यानंतर आजच्या व्यवस्थापकीय रचनेच्या ( Modern Management) दृष्टीकोनातून त्याचे विश्लेषण  करणे थोड़े सोपे जाईल

१७५७ -१७५८  च्या पराभवाचा  वचपा  काढण्यासाठी ज्यावेळी  अहमद शाह अब्दाली अणि नजीब खान यांच्या फौजेनी दिल्ली गाठली अणि बादशाहला ताब्यात घेतले तेव्हा त्यांचे संरक्षक म्हणून मराठे जेव्हा दिल्लीकडे जायला निघाले  तेव्हा

 नेतृत्व (Leadership ) :

वर उल्लेखलेल्या यशस्वी मोहिमेनंतर  राघोबा दादा अणि होळकर , शिंदे, बुंदेले हे सरदार या मोहिमेचे नेतृत्व करणार यात  काहीच शंका नव्हती। मागच्या मोहिमेतील अनुभवावरुन  या मोहिमेवर जाण्यासाठी राघोबा दादां नी  कोटी रुपयांची मागणी केली। सैन्य जगविण्यासाठी  रसद , धान्य पुरेसे असावे अणि राजपूत, जाट, गुर्जर यांच्या कडून फारशी मदत होणार नाही हे ओळखून  ही मोठ्या रकमेची मागणी होती  त्यावेळेच्या आर्थिक परिस्थितीत नानासाहेब पेशवा ती मागणी मान्य करणे अवघड होते।  नुकत्याच निजामविरुद्ध झालेल्या लढाईत विजय मिळविलेला सदाशिवराव भाऊ अर्थातच जोशात होता त्याने या मोहिमेचे नेतृत्व करण्याची तयारी दर्शविली।  भाऊ अणि विश्वासराव कितीही पराक्रमी असले तरी उत्तरेतील त्यांची ही पहिली मोहिम होती . राघोबा दादा सारखा अनुभव अणि येणाऱ्या संकटांचा अंदाज त्यांना नव्हता।  होळकर , शिंदे , बुंदेले मदतीला होतेच पण  कुठेतरी अनुभवी अणि पराक्रम सिद्ध केलेल्या सरदाराला डावलून तरुण धाडसी पण अननुभवी नेतृत्वाच्या बरोबर  लढणे त्यांच्या पचनी पड़णे थोड़े अवघड होते।  त्यांच्या निष्ठेविषयी शंका कधीच नव्हती  पण त्यातून जाणाऱ्या इशाऱ्याची भीती  होती।

Modern Management Lessons:

  • Put Your Best foot forward
  • Opportunity must be given to Young/Energetic Turks, but the same needs to be calibrated by Experienced Commander in chief ( Leader) who understands the intricacies of battlefield to avoid disruption

संसाधने (सैन्य , लवाजमा , युद्धसज्यता , रसद ): Resources


मराठ्यांच्या शौर्याचा डंका पूर्ण भारतवर्षात गुंजत असताना  सदाशिव राव भाऊ  , विश्वासराव २०००० चे सैन्य अणि इब्राहिम गर्दीचे ९००० सैनिक अशी फौज घेऊन दिल्लीकडे निघाले। होळकर , शिंदे , बुंदेले हे  सरदार अणि त्यांची मंडळी पण  बरोबर होतीच।  तोफखाना , बन्दुका , घोड़े  हत्ती , तोफा  असा मोठ्ठा लवाजमा बरोबर होता।  त्यावेळी मराठे अशा विजयी मानसिकतेत होते की ही लढाई एक औपचारिकता  होती  या अफगाणी लोकांचा पुन्हा पराभव करण्याची।  साहजिकच उत्तरेतील मोहिम  असल्यामुळे अणि त्या भागात हिन्दू तीर्थस्थाने येत असल्याने तीर्थयात्रा करण्यासाठी सुमारे २००००० लोक( सरदारांच्या बायका , त्यांचे सेवक , तीर्थयात्री ) या सैन्याबरोबर दिल्लीकडे निघाले होते। मराठी सैन्याने मार्च १७६० मध्ये दिल्लीकडे कूच केली।  तापी , नर्मदा , चंबळ , यमुना ओलांडून दिल्ली गाठायाची होती।  साधारण पावसाळा ( जुलेे ) सुरु होण्यापूर्वी या नदया ओलांडणे  गरजेचे होते।  हा प्रचंड लवाजमा , तोफखाना या सर्वांसकट चंबळ  ओलांडून आग्र्याच्या वेशीपर्यंत पोचण्यासाठी मराठी लवाजम्याला  जून १७६० उजाडला।  गंभीर नावाची छोटी नदी पार करून  आधी आग्रा अणि यमुना पार करून मग दिल्लीकडे जाण्यासाठी  थोडेच दिवस शिल्लक राहिले। पहिला बाजीराव जे अंतर ४ दिवसात कापायचा ते अंतर पार करण्यासाठी या लवाजम्याला २० दिवस लागत होते। अथक प्रयत्न करून गंभीर नदी ओलांडल्यानंतर आग्रा पोहचेपर्यंत " जिहादच्या हाकेने "अवधचा नवाब 'सिजा उद  दौला'  नजीब खान रोहिला अणि अब्दाली यांना मिळाला होता।  पावसाळा चालू झाल्याने नदी पार करणे कठीण जात होते , अनेक घोड़े  "तमाशा" या रोगाने मरण पावले।  पावसाळ्यामुळे  तोफखाना घेऊन नदी ओलांडणे अवघड जात होते ।  अन्नधान्य संपत चालले होते रसद पुरविण्यासाठी उपयुक्त असलेला अवध प्रान्त त्याच्या नवाबमुळे विरोधात बसला होता। अशा बिकट परिस्थितीत खूप प्रयत्नान्तर मराठे सैन्य दिल्लीत (यमुनेच्या पश्चिम किनाऱ्यावर )पोहचले। दिल्लीत अफगानी लोकांचा पराभव करून दिल्ली ताब्यात घेतली।  तिथे पैसे (सिंहासन वितवळून चांदीची नाणी पाडली ) अणि रसद, धान्य यांचा बंदोबस्त केला। अब्दाली अणि नजीब खान यमुनेच्या पूर्वेला होते।
पूर्वीच्या युद्धपद्धतीनुसार नदी ओलांडायचे जे उतार असतात ते अडवून शत्रुला जेरीला आणायचे  असते।  ते काम अर्थातच  दत्ताजी शिंदेंकड़े होते। याच  सुमारास सूरजमल जाट लढाईतून  माघार घेऊन तठस्थ राहिला ( कारण आता मराठे जिंकणार अणि विश्वासराव बादशाह होणार )।

Modern Management Lessons:


  • This is like Cricket. Centurion in one game needs to go out in the second game and start making runs from zero.  Or like Mutual Fund advisory : Past Performance does not guarantee future returns"
  • Lean & Mean resource Management to achieve timely delivery & battlefield readiness( Time to market)
  • No Mixing of Business & Pleasure
  • Clear & Effective Communication to forge critical alliances
  • Resource Management
युद्धाची ठिणगी व मराठ्यांची कोंडी ( Building up to Battle)

दिल्ली हातची गेल्यामुळे अब्दाली अणि नजीब खान संधीची वाट पाहत होते।  एकमेकांची ताकद आजमावण्यासाठी थोड्या  चकमकी होत होत्या।  यमुना पर करण्याचे प्रयत्न होत होते।  अश्याच एका चकमकीत बुरारी घाट येथे दत्ताजी शिंदेंना अफगाणी  फौजांनी मारले। ही बातमी कळल्यानंतर मराठे सैनिकांनी बदला घेण्यासाठी कुंजपुरा किल्ल्यावर जेथे अफगाणी  फौजेची रसद होती , धान्य होते अणि अब्दालीचे शूर सरदार होते तिथे  हल्ला करून अफगाणी लोकांचा पराभव केला।  १०००० अफगाणीसैन्याची कत्तल केली।  धान्य , रसद गोळा  केली।  विजयानंतर कुरुक्षेत्र जवळ असल्याने तीर्थयात्रेसाठी मराठी लवाजमा तिकडे गेला। अब्दालीला ही गोष्ट कळल्यानंतर  याचा बदला घेण्यासाठी पावसाळ्यांत दुथडी भरून वाहणारी यमुना ओलांडण्याचा बेत त्याने आखला।  गुलाबचंद गुर्जर (आता मराठे जिंकणार अणि विश्वासराव बादशाह होणार , म्हणून अब्दालीला सामिल झालेला ) याने त्या वेळी यमुना पार करण्यासाठीचा बागपत जवळील उतार अब्दालीला दाखविला  अणि अब्दाली सैन्यासह दिल्ली अणि कुरुक्षेत्र याच्या मध्ये येऊन थांबला।  या पुढील काळात जवळ जवळ दोन महीने  चकमकी होत राहिल्या , दोन्ही बाजूचे काही सैनिक मारले जात होते। अब्दालीच्या सैन्याच्या ठिकाणामुळे मराठे सैन्याला रसद, मदत मिळणे  अवघड झाले।  ऑक्टोबर ते डिसेम्बर या दोन महिन्यात धान्य , रसद संपत चालली होती।  चारा  नसल्यामुळे जनावरे मरणे  चालू झाले होते।  दिल्ली कडून मदत घेऊन येताना  बुंदेले , मानकेश्वर सरदार पकडले गेले अणि अब्दाली अणि त्यांच्या सैनिकांनी त्यांना मारून  पैसे लुटले।  भाऊ अणि त्यांचे निरोप  पुण्यापर्यंत पोचण्यासाठी वेळ लागत होता। त्याच वेळेला पश्तून सैनिकांच्या टोळीने पंजाब प्रांता कडून मराठ्यांना घेरून रसद मिळविण्याचा मार्ग बंद केला।  राजपूत , गुर्जर  तठस्थ होते त्यामुळे मदत मिळाली नाही। मराठे सैन्याचे मनोबल खच्ची होत  चालले होते लढाईत मरण्यापेक्षा उपसमारीने मरण्याची वेळ सैन्यावर आली होती। अशा परिस्थितीत आक्रमण करण्याची तयारी भाऊ , गार्दी , मराठे सरदार यांनी चालू केली। अब्दालीकडे असणाऱ्या दुर्बिनीने तो हे सर्व पाहत होता।  उंटावरुन चालविल्या जाणाऱ्या तोफा त्यांच्या कड़े होत्या।  हे कमी म्हणून की काय  हवेची दिशा पण मराठे लोकांना साथ देत नव्हती , त्यामुळे मेलेल्या लोकांच्या , जनावरांच्या प्रेताच्या दुर्गंधीने मराठे हैराण झाले होते।


Modern Management Lessons:
  • Clear & Effective Communication about the intent, goal, possible outcome with allies, partners.
  • Channel preparation for seamless flow of information, resources in case of crisis
  • Expect the unexpected due to uncontrollable factors like weather,, Rules, Regulation change etc.
  • Use of latest Technology
प्रत्यक्ष युद्ध (Battle )

उपासमार  यामुळे होणारे सैनिकांचे हाल , लोकांचे खचत चाललेले मनोधैर्य  यामुळे भाऊ अणि विश्वासराव यांनी आता लढाईचा पवित्रा घेतला।  त्याप्रमाणे व्यूहरचना तयार केली।  इब्राहिम गार्दी ह्याने फ्रेंच लोकांकडून शिकलेले "Qol" किंवा " Ghol" हे युद्ध तंत्र  वापराचे ठरविले ज्यामध्ये तोफखाना , त्यामागे दोन सैनिक तुकडीमध्ये  ,मध्ये बरोबरचे लोक (जे सैनिक नाहीत ),  त्यानंतर भाउ विश्वासराव यांची हुजरात व शेवटी लढणारी तुकडी असे स्वरुप होते।  एका बाजूला गार्दीच्या तोफा होत्या , दुसरीकडे जनकोजी शिंदे , होळकर यांच्या तुकड्या होत्या।  गार्दीच्या तोफांनी रोहिल्ल्यांची
दाणादाण उडवली होती  काही हजार रोहिले मरण पावले।  मराठे अब्दालीला भारी पडत होते।  इथे दोन गोष्टी घडल्या।  या मराठ्यांच्या आक्रमणाने उत्साहित होऊन जनकोजी शिंदे अणि काही सरदार मंडळी "Ghol " तोडून लढायला पुढे सरसावली त्यामुळे गार्दी लोकांना तोफा थांबवायला लागल्या।  त्यातच अब्दालीने उंटांवरून तोफा डागल्या।  अणि एक गोळी विश्वासरावला लागली। अपशकुन झाला।  खचलेले सैन्य सैरभैर पळ लागले। भाऊ लोकांना लढायचे आव्हान करतो आहे  पण लोक पळून गेले।  तेव्हा अब्दालीने आपली १००००+ लोकांची reserve फौज बाहेर काढली अणि त्या फौजेने  दमलेल्या मराठे सैनिकांचा पराभव केला।  दुसऱ्या दिवशी कुंजपुराच्या सैनिक कत्तलीचा  बदला म्हणून ४००००+ लोकांची कत्तल केली।

Modern Management Lessons:
  • Strategy  needs to be explained to people on the ground to make that effective
  • clear communication w.r.t strategy will make it more reliable for execution.
पराभव नंतर ....

साधारणपणे जेता अणि पराजित यामध्ये जे नाते असते तसे या लढाई नंतर झालेले दिसले नाही. एक तर या युद्धाआधी  बरेच दिवस भारतात तळ  ठोकून बसलेल्या अब्दालीला अफ़ग़ाणिस्तानात बं डाळीची भीति निर्माण झाली त्यामुळे पराभव नंतर देखील मुघल इंडिया चे संरक्षक म्हणून मराठेंना कायम करण्यात आले।  अब्दालीचे पण  ५००००+ अधिक लोक मारले गेले होते।  खऱ्या अर्थाने ही लढाई "Pyrric victory" होती ज्यामध्ये दोन्ही बाजूचे खुप नुकसान झाले।

Modern Management Lessons:
  • Price war, Win at any cost sometimes create huge drain on resources which result in log term reverses for the organisation even in the short term victory/ territorial gains

साहजिकच  पुढे थोरल्या माधवरावच्या नेतृत्वाखाली मराठे लोकांनी नजीब खानाला धड़ा शिकवला।  दिल्ली चे संरक्षक म्हणुन आपली जागा अधिक पक्की केली अणि २० + वर्षे दिल्लीत आपला भगवा ध्वज मानाने पडकत ठेवला।

  " त्यावळेची हिन्दू पद पादशाही " अणि आताचे " हिन्दू राष्ट्र " या संकल्पनांमध्ये कमालीचे साम्य आहे।   त्यावेळेच्या चूका पुन्हा करायच्या नसतील तर संवाद (Communication) हे अत्यंत महत्त्वाचे आहे।  पेशवा दिल्लीच्या गादीवर बसणार म्हणून त्यांच्याकडे पाठ फिरविणारे जाट अणि राजपूत हिन्दूच होते। " Citizen Amendment Act(CAA): च्या मुद्द्यांवर "गुद्दापेक्षा चर्चा " महत्त्वाची ठरणार आहे।  CAA ला विरोध करणारे पण हिंदूच आहेत। तो निर्णय  हा का गरजेचा आहे हे पटवून सांगणे गरजेचे ठरेल। " इस्लाम खतरेमें " ची आवई  तेव्हा पण होती आज पण माध्यमे तीच धून गात आहेत। पूर्वी आक्रमणे  खैबर खिंडीतून होत  होती आज "खैबर पख्तूनका (KPK), बालाकोटमध्येच भारताचे शत्रू दडलेले होते ।  राष्ट्रभक्त मुस्लिम लोकांना काळजीचे कारण नाही हे ठसवणे तितकेच गरजेचे कारण त्यावेळी पण गार्दी लोक   पेशवांंसोबत होतेच।

संक्रांत साजरी करताना  पानिपतचे स्मरण गरजेचे आहे  कारण त्यातून मिळणारी शिकवण पुढे संक्रांत ओढ़विणार नाही यासाठी उपयुक्त ठरु शकेल।

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा।


Monday 6 January 2020

                                                    Diversity & Scotland of India 

Image result for coorg pictures selfie pointImage result for coorg pictures selfie pointImage result for coorg pictures coffee plantation

सरत्या वर्षाला निरोप देताना व नववर्षाचे स्वागत करताना  घडून गेलेल्या घडामोडींचा लेखाजोखा मांडणे अणि   नविन वर्षाकडून  असणाऱ्या अपेक्षांचे सुतोवाच  करणे  तसे आता नित्याचेच । कधी  ते वेगवेगळ्या माध्यमांच्या "Annual Conclave" मध्ये  चर्चिले जाते तर कधी ते घरबसल्या होणाऱ्या गप्पांच्या अड्ड्यात रंगते ।  

सरत्या वर्षाची हळहळ अणि नविन  वर्षाची हुरहुर  या भावनाकल्लोळामध्ये  आर्थिक , सामाजिक ,  कौटुंबिक , राजकीय अशी  जीवनाची सर्वच अंगे  व्यापून जातात।  कुठे  ती "मंदिर वही बनायेंगे"ची अपेक्षापूर्ति असते तर कुठे  " मित्रपक्षाने दगा दिला ... नाहीतर सरकार आमचेच होते " चा उसासा असतो।  कुठे  ती  " 5 Trillion  dollar economy  in 2022 : जुमला की वास्तव " ची  गहन आर्थिक चर्चा असते  तर कुठे  "रोजगार विरहित आर्थिक वाढ( Jobless Growth); Industry 4.0 अणि त्याचे सामाजिक परिणाम (Social Impact)" वरचे सुंदर विवेचन असते।  कधी ती "दुसऱ्या घरखरेदीची" स्वप्नपूर्ति असते तर कुठे "हुकलेल्या  नोकरी /व्यवसाय /परदेशातील संधीची " हुरहुर असते।  या सर्व गोंधळात(कोलाहल हा  शब्द खरे तर फिट बसेल ) खालील २-३ गोष्टींनी ठळकपणे  माझे लक्ष वेधून घेतले त्या खालील प्रमाणे :

  • हिंदुस्तान टाइम्सच्या "Annual Conclave "  मधील 3K (करीना कपूर खान ) & AK ( अक्षय कुमार ) यांची मुलाखत आणि  करीनाने व्यक्त केलेली "Equal Pay for Lead Actor & Actress" ची  इच्छा  
  • हिंदुस्तान टाइम्सच्याच  "Annual Conclave "  मधील  ट्विंकल खन्ना (Mrs Funny bones & Pajamas are forgiving ची लेखिका )& अमिश त्रिपाठी (Shiva Trilogy & Sita  etc. पुस्तकांचे लेखक ) यांची मुलाखत  आणि  ट्विंकलने  व्यक्त केलेली अपेक्षा ; ती म्हणजे " No. 1 Female Author in India"  पासून " No.1 Author in India "  बनण्याचे स्वप्न। 
  • "Tata Sons-Dalberg " यांनी केलेला भारतातील सर्वे अणि त्याचे निष्कर्ष (Findings) " 12 कोटी  उच्च माध्यमिक शिक्षण झालेल्या मुली  सामाजिक रुढि , सुरक्षा , कौटुंबिक जबाबदाऱ्या यामुळे  नोकरी /उद्योग  करत नाहीत।  अणि जर त्यांनी काम करायचे ठरविले तर  भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात(GDP)  $440 billion( ३१  लाख करोड़ रूपये )  भर आपण घालु शकू।या संधीचा अवाका लक्षात घ्यायचा असेल तर हा नंबर  सध्याच्या भारताच्या GDP च्या १५ % आहे।  
यातील पहिले  दोन संदर्भ  हे आपण आजूबाजूला पाहत असलेल्या "India"ची प्रतिनिधिक उदाहरणे आहेत।  स्री शिक्षण , स्रियांचा सेवाक्षेत्रातील वाढता वावर , त्यांच्या आशाआकांक्षा , स्वतंत्र विचारशैली  अणि  उराशी  जपलेली स्वप्ने , ती सत्यात उतरवण्याची जिद्द  हे एका बाजूला अणि  ही प्रगति उत्तरोत्तर होत रहावी म्हणुन पोषक वातावरण निर्मिति ही दुसऱ्या बाजूला अशा सशक्त चाकांवर "Diversity Express" वेगाने पळत आहे। तर तिसरा संदर्भ  हा  "Bharat " या संकल्पनेमधील "Potential " & ते फुलू देण्यासाठी  जर आपण मार्ग शोधले  तर निर्माण होणाऱ्या अमर्याद प्रगतीच्या संधी "बेटी बचाओ / बेटी पढ़ाओ " या सरकारी घोषणेला खऱ्या अर्थाने एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतील अशी अपेक्षा निर्माण करणारा ।

हा विचार मनात रेंगाळत असतानाच  वर्षअखेरीस कौटुंबिक सहलीसाठी मी "Scotland of  India " ला भेट दिली। ( देशी सहल करणे हा foul धरला जात असल्यामुळे केलेल्या देशी सहलीला परदेशी सहलीचे आवरण चढवुन जग रहाटी पाळण्याचा केलेला भाबडा प्रयत्न।  असो ).

आमच्या सांगली जिल्ह्यापेक्षा क्षेत्रफळाने निम्मा असलेला , ७५% भूभाग जंगलानी व्यापलेला , जैवविविधेत अत्यंत श्रीमंत असलेला , पश्चिम घाटाच्या पूर्वेकडे वसलेला, "ब्रह्मगिरी " अणि "सुब्रमण्यम "या पर्वत रांगांच्या अंगाखांद्यावर खेळणारा , कावेरी(नदी ) अम्माच्या  मांडीवर खुलणारा,  निसर्गाने मुक्त हस्ताने वरदान बहाल केलेला प्रदेश म्हणजे "कोडागु (Kodagu )". १९५६ पर्यन्त स्वत्रंत राज्य असणारा अणि नंतर त्यावेळच्या म्हैसूर (Mysore ) राज्यात विलीन झालेला व आता कर्नाटक राज्याचा भाग असलेला  हा नितांत शांत अणि सुंदर प्रदेश म्हणजे "कूर्ग (Coorg )".

जसे कोकण म्हटले की  " हा सागरी किनारा। ओला सुगंध वारा " या ओळींप्रमाणे  अथांग सागर अणि त्याच्या साथीने फुलणाऱ्या नारळी फोफळीच्या बागा , फणस ,सुपारी , काजू अणि आंबा (Mangoes ), कोकम हा रान मेवा  अशा सगळ्या गोष्टी मनात येतात। त्यात भर म्हणून  जोडीला  जर भात अणि माश्याचे कालवण असेल तर आनंदाची परमावधीच।  त्याचप्रमाणे "कूर्ग (Coorg ) म्हटले की  दोन्ही हात पसरून  आपल्याला  आलिंगन देणाऱ्या हिरव्यागार पर्वतरांगा ,  मातेच्या मायने आपल्याला  अंगाखांद्यावर खेळविणारी कावेरी(नदी ) अम्मा  अणि " Number 54 & the house with a bamboo door"या गाण्याप्रमाणे  पिवळ्याशार मातीतील बाम्बुचे , ओक वृक्षाचे वन अणि त्या सावलीत फुललेला रत्नांचा महल म्हणजे " कॉफी( Coffee )"& " मसाल्याच्या ( Spices ) " बागा म्हणजे मुक्त हस्ताने निसर्गाने केलेली जैवविविधतेची उधळणच , त्यामुळेच की काय त्याला Estate वैगरे म्हणत असावेत। भोवताली डोंगर , दोन्ही बाजूला गर्द झाड़ी , सुन्दर  कॉफीचे म ळे , वळणा वळणावर  डोका वणारी  कावेरी नदी & त्यावर  टाकलेले पूल , &अश्या चढ़ उतरणीच्या रस्तात असणारी छोटी छोटी घरे किंवा "Home Stay" पुरविणारी घरगुती हॉटेल्स  म्हणजे  मडिकेरी किंवा विराजपेठ ही  कोडागुमधील मुख्य पर्यटक ठिकाणे।

साधारण "पर्यटन स्थळाला भेटी (Tourist Destination)" हा जो प्रकार असतो  त्याची मला धास्ती आहे कारण "दत्तदिन्गंबर किंवा साई दर्शन  छाप टूर मध्ये पाहण्यापेक्षा "पाहिले " हा Tick mark जास्त महत्त्वाचा असतो  अणि दूसरी भीती जी मला शाळेपासून छळते  ती म्हणजे  ही प्रेक्षणीय  ठिकाणे पाहिल्यावर सांगा पाहु "अमुक अमुक ठिकाण समुद्र सपाटी पासून किती उंचावर आहे " किंवा " आपण पहिलेल्या राजवाड़ा कुठल्या राजाने किती साली बांधला अणि तो कुठली बांधकाम शैली वापरून बांधला " असली बौद्धिके।  आता आपण शाळेत नाही त्यामुळे  तो राजा , त्याचा राजवाड़ा , ती सनावळ  आपली शाळा  करणार नाही हे मनाशी पक्के ठरवून "sightseeing " पाहून अणि ऐकून  काढले।

 कधी तिथे "Abbey Falls / Irupu  Falls  " चा "वॉलपेपरला " शोभेल असा जीवंत नैसर्गिक देखावा ,  पाण्याचा गारवा मन मोहुन गेला।  तर कुठे "मंडलपट्टि "ची  Rough जीप Ride  निराळाच जीवनानुभव देऊन गेली। " भागमंडलच्या "देवळाच्या  परसातील त्रिवेणी संगम "आमच्या तुळापुरची" आठवण करुन गेला।  "तलकावेरी " च्या निसर्गरम्य परिसरात आदि काळापासून पाण्याचे महत्त्व अणि त्याचा रोजच्या आयुष्यातील अविष्कार म्हणजे जीवनदायी कावेरी नदी  व तिचा उगम हे पाहताना " Utility " ते " Deity" पर्यन्त कावेरी अम्माचा प्रवास डोळे भरून पाहता आला। "आले देवाजीच्या मना .. " च्या धर्तीवर प्रत्यक्ष ब्रह्मदेवच्या विनंतीने कावेरी माता तिथे प्रकट झाली असे मानतात , हे कळल्यावर अणि आजूबाजूचे निसर्गसौंदर्य पाहिल्यावर " कावेरी " अम्माच्या " Beauty Consciousness" चा हेवा वाटला।

निसर्गाची जैवविविधतेच्या संपत्तीची   उधळण डोळे भरून पाहिल्यानंतर आम्ही मोर्चा वळविला तो मानवनिर्मित " Coffee & Spices" Estate कड़े।   २३० एकरात पसरलेली ती बाग आमचा टूर गाइड व्यवस्थित  समजावून सांगत होता , कॉफीची झाड़े , त्याचा हंगाम , त्याचे प्रकार (Arabica & Robusta) या बरोबरच वेगवेगळ्या मसाल्याच्या जाती , त्याची रोपे हे अगदी सोदाहरण दाखवत होता।  विडाच्या पानांसारखी दिसणारी मिरिची  पाने & त्याची फळे (Black Pepper), कर्दळीच्या पानांसारखी दिसणारी " वेलदोड्याची  रोपे" ( Cardamom) , Vanilla  चे रोपटे, दालचीनीची झाड़े किंवा तमालपत्र  (Cinnamon Tree  & its  leaves ) अशी शहरी माणसासाठी किराणा मालाच्या दुकानातून पॅकेटमध्ये येणाऱ्या वस्तूंची झाड़े पाहून काढली।  त्या आनंदात असतानाच , एका नकळत्या क्षणी त्या टूर गाइडने प्रश्न केला, तो असा  " या कॉफीच्या बागेत काम करणाऱ्या पुरुष अणि स्री कामगाराला किती पगार मिळत असेल & कॉफी फळे तोडण्याच्या हंगामात  बोनस किती मिळत असेल ? ". आकड़ेच लावायचे असल्याने बरेच लोक हिरिरिने भाग घेत होते।  सर्वांचे अंदाज बांधून झाल्यावर त्या गाइड ने जी माहिती दिली ती  विचार करायला लावणारी होती।  स्री किंवा पुरुष कामगार दिवसाच्या रोजन्दारीवर तेथे काम करतात।  दोघांनाही सारखा भत्ता (Daily Wages) दिला जातो अणि कॉफी फळे तोडण्याच्या हंगामात बोनस पण पूर्णत: किती किलो कॉफी फळे गोळा केली त्याच्या प्रमाणात दिला  जातो। स्री किंवा पुरुष कामगार जर समसमान फळे गोळा करत असेल  तर बोनस सारखाच। मला वाटले हा बागमालक दयाळू वैगरे असेल (हल्लीच्या भाषेत Compassionate Capitalist),पण  मग नंतर कळले की भारतातील ७० % कॉफी ही कूर्गच्या परिसरात लावली जाते अणि सगळीकडे असेच भत्ते (Daily Wages ) दिले जातात। तेव्हा मात्र  मनात घोळ णाऱ्या त्या विचाराने उचल खाल्ली अणि सहज कुतूहल म्हणून  तिथल्या स्थानिक लोकांविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला।

जैवविविधतेसाठी (Biodiversity) प्रसिद्ध असलेल्या या प्रदेशाने  लोकसंख्येच्या वैविध्यतेमध्ये पण ( Population Diversity ) आपला अग्रक्रम  टिकविला आहे (Sex Ratio : 1019 Women Vs 1000 Men ) अणि  साक्षरतेच्या ( Literacy  Rate )बाबतीत ८० % हुन अधिक लोक साक्षर आहेत।  या स्थानिक लोकांना "कोडावा" म्हणतात।  निर्सगाने रसरसलेल्या या प्रदेशात अर्थातच हे लोक  निसर्गप्रेमी अणि शेतकरी आहेत।  धर्माने ते हिन्दू असले तरी देव देवतांचे ( कावेरी अम्मा सोडून ) पूजन न करता आपल्या पूर्वजांना देव मानून त्यांची पूजा करतात।  पूर्वजांच्या आठवणीसाठी त्यांच्या घरात आपल्याकडे आपण देवासमोर जसा दिवा लावतो तसा दिवा  पूर्वजांच्या फोटोपुढे तेवत असतो। घरच्या वरिष्ठ स्रीला कुटुंबप्रमुखाबरोबरच  दिशादर्शकाचे काम करावे लागते कारण या लोकांच्या सामाजिक अणि धार्मिक विधी मध्ये  पुरोहित , पोथ्या , देव  यांना स्थान नाही। परंपरा , चालिरीति या मौखिक आहेत ज्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्त होतात। त्याचा फायदा असा आहे की "उगाच----शास्त्रों में लिखा है ---" च्या नावाखाली रुढि परंपरांचे गुणगान नाही तर  काळाप्रमाणे  बदलण्याची लवचिकता दिसते।  मुलगा मुलगी एक आहेत त्यामुळे " लग्नात कन्यादान वैगरे होत  नाही ". जी गोष्ट  सामाजिक चालिरितींची  तीच त्यांच्या पोशाखाची अणि खानपानाची।  असे म्हणतात की हे लोक " born naturists" आहेत त्यामुळे  शेतात पिकणारे तांदुळ  व त्याचे वेगवेगळे प्रकार , बरोबरीला मसाले युक्त  पंधी करी (Pork Curry), अक्की रोटी ( तांदळाची ) हाच मुख्य आहार।  पोशाख पण शेतात काम करताना सोपे जावे असा।  ही लवचिकता इतकी स्रियांचा पदर घेण्याची अणि साडीच्या नीरा घालण्याची पद्धत अशी जी ज्यामुळे भात शेतात किंवा कॉफी बागेत काम करताना दोन्ही हात  मोकळे  राहावेत।  "Productivity Index " मध्ये हा समाज भलताच Efficient निघेल। ते करताना पण "Arabica " कॉफीचा तरल भाव & " Robusta " कॉफीचा robustness यांचा सुन्दर समतोल आढळतो।

तेच रहस्य आहे त्या कॉफी बागेतील "Equal Pay " मध्ये।

मनात विचार आला की " India " मधील वर उल्लेखलेल्या Diversity Expressला  अजुन जोरात धावण्यासाठी ऊर्जा  अणि " भारत " या संकल्पनेतील " स्रियांचा रोजगारातील सहभाग " वाढविण्यासाठी  स्फूर्ति देण्याचे काम  करण्यासाठी गरज आहे  ती "Look South" पॉलिसीची।

हे लिहताना कुठे तरी मराठी म्हणून माझा उर भरून येतो कारण याच साठी ( स्री शिक्षण & सबलीकरण )  क्रांतिज्योति सावित्रीबाई फूल्यांनी धर्ममार्तण्डांकडून दगड धोंडे खाल्ले होते , अवहेलना सहन केली होती . महर्षि कर्वे यांना  याच  कामासाठी सामाजिक बहिष्कार अणि उपास सहन करावा लागला होता। "याच साठी केला होता अट्टाहास " म्हणत केलेल्या प्रयत्नरूपी झाडाला लागलेली  फळे पाहून  आज ते नक्कीच सुखावले  असते। 

मागच्याच आठवडयामध्ये क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांची १८९  वी जयंती साजरी झाली।  त्या माऊलीला आदरांजली म्हणून हा  " Blog ."

Happy New year to all of you!



  प्रमुख  वक्ते : डॉ अजित वामन आपटे  शिक्षण :   B.A , M.P.M , D.M.M ,D.I.T.M , P.H.D (छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापनशैलीचा चिकित्सक ...