Saturday 19 October 2019

सहकार महर्षी का मेट्रोमॅन ?

महाराष्ट्राच्या निवडणुकीची प्रचार रणधुमाळी आज समाप्त झाली। नवीन लोकप्रतिनिधी व प्रशासन निवडण्यासाठी मतदारराजा आता सज्ज झाला असून येणाऱ्या २१ तारखेला तो आपला निर्णय मतपेटीतून व्यक्त करेल। साहजिकच या निवडणुकीत काय  होणार " महायुतीचे " २/३ बहुमताचे सरकार येणार की विरोधी पक्ष म्हणतात त्याप्रमाणे जो "undercurrent " किंवा  सध्याच्या राज्यकर्त्यांच्या बद्दल असणारा राग   सत्तापरिवर्तन करून दाखविणार। या साठी फार नाही  पण  २४ ऑक्टोबर पर्यन्त वाट पहावी लागेल। 

मला मात्र ही निवडणूक  महाराष्ट्राचा नेता कोण या प्रश्नाचे उत्तर ठरवणारी आहे असे वाटते कारण या वेळी मला बरोबर पाच वर्षापूर्वी जेव्हा भाजपाचे सरकार "देवेन्द्र फडणवीस "यांच्या नेतृत्त्वाखाली स्थापन झाले तेव्हा "शेखर गुप्ता " या प्रसिद्ध पत्रकारने एका इंग्लिश वर्तमान पत्रासाठी लिहलेला लेख आठवला ज्यामध्ये  त्यांनी असे म्हटले होते की  फडणवीस यांच्या रूपाने  महाराष्ट्राला  असा नेता मिळाला आहे ज्याची स्व:तची ना सुतगिरणी (Textile Mill ) आहे ना साखर कारखाना( Sugar Factory ) ना पतपेढी (Credit Society ). थोडक्यात काय तर तोपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणाची ओळख बनलेल्या सहकार क्षेत्रापासून (Co-Operative Moment) लांब असणारा , नागपुर दक्षिण सारख्या शहरी मतदार संघातुन निवडून आलेला , नागपूरचे महापौर पद एवढाच शासनाचा अनुभव असणारा एक तरुण पण नवखा राजकारणी महाराष्ट्राची सुत्रे हातात घेत होता। सामाजिक अणि जातीय समीकरणात फिट्ट न बसणारा  हा  तरुण काय करू शकेल या बद्दल उत्सुकतेपेक्षा 
साशंकताच अधिक होती  . 

१९६२ साली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर मुंबई महाराष्ट्रात आली पण त्याचे नेतृत्त्व खऱ्या अर्थाने ग्रामीण महाराष्ट्रानेच केले। मग ते यशवंतराव चव्हाण असोत किंवा वसंतदादा  पाटील असोत , नेतृत्त्वाचा चेहरा हा कुठे ना कुठे  शेती, त्याचाशी निगडित जोड उद्योग , सहकार चळवळ  यांच्या रुपाने  ग्रामीण अर्थकारणाशी एकरूप झालेला दिसायचा।  यातून या नेत्यांच्या प्रदेशा पुरती विकासाची बेटे तयार होत गेली। अशा  जहागिरदार नेत्यांची मोठ बांधून राजकारभाराचा गाड़ा हाकला जात होता। आजच्या भाषेत सांगायचे तर  सत्तेतुन पैसा , पैशातून संस्था , अणि त्याद्वारे हक्काचा मतदार असा  निवडणुका जिंकण्याचा रामबाण उपाय होता तो। 

१९९१ नंतर आर्थिक उदारीकरणाने म्हणा किंवा  त्यानंतरच्या माहिती तंत्रज्ञानच्या क्रांतिने अणि उद्योगस्नेही धोरणामुळे शहरीकरण वाढू लागले।  मुंबई , पुणे , नाशिक असा सुवर्णत्रिकोण (Golden Triangle ) तयार झाला  .  अनेक तरुण चांगल्या नोकरीच्या शोधात  शहरात स्थलांतर करू लागेल। खा ऊ जा ( खासगीकरण , उदारीकरण , जागतिकीकरण ) संस्कृति मूळ धरु लागली।  त्या तरुणांची स्वप्ने वेगळी होती , त्यांच्या समस्या  निराळया  होत्या। त्यांचे प्रश्न हे पिण्याचे पाणी , महिला सुरक्षा, स्वस्तात घरे  ते  चांगली सार्वजनिक वाहतूक , चांगले रस्ते असे अत्यंत मुलभुत अणि रोजच्या जीवनाशी निगडित होते। दुर्दैवाने त्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रमुख राष्टीय  पक्ष कमी पडत होते।  नाही म्हणायला शिवसेनेसारखे काही प्रादेशिक पक्ष तो प्रयत्न सातत्याने करत होते , पण " मायबाप " सरकारच्या भूमिकेत असणाऱ्या मुख्य प्रवाहातील कांग्रेस सारख्या पक्षाला  सरकारची बदललेली भूमिका जाणून घ्यायची इच्छा नव्हती।  ही संधी शिवसेनेसारख्या प्रादेशिक संघटनेने अणि त्याकाळी विशिष्ट जाती जमाती यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भाजपाने बरोबर हेरली।हाच शहरी नोकरदार वर्ग पुढे मतदाता म्हणून भूमिका बजावत असताना प्रस्थापित सत्तारूढ़ पक्षाच्या धोरणांमुळे  त्यांचे बंध  जोडले जाणे  थोड़े कठीण होते अणि बरेचदा तर  त्या "आम्ही दोघी " चित्रपटातील  खालील गाण्यासारखीच परिस्थिती होती 
" वेगळ्या वाटा निराळे आपले आभाळ हे।
  का तुझ्या माझ्यात असती बंध कुठले ना कळे।

अशा अनुकूल वातावरणाचा फायदा  खरे तर विरोधी पक्षांना आपसूक झाला।  १९९५ साली आलेले  महायुतीचे सरकार ही त्या बदलत्या सामाजिक वास्तवाची चुणूक होती। आणिबाण ीसारख्या बिकट परिस्थितीत देखील  ज्या राज्याने कांग्रेसला भरभरून साथ दिली त्या महाराष्ट्रात साधे बहुमत व सत्ता  पण पुढल्या काळात आघाड्या करुन मिळवावी लागली । शेतीच्या समस्या  जसे की  दुष्काळ, सिंचन , शेतमालाला रास्त भाव  ,सहकार सारख्या अत्यंत सुंदर संकल्पनेत  घुसलेला भ्रष्टाचार हे प्रश्न जसे बिकट होत गेले तशी कांग्रेस ची राजकीय पकड सैल झाली , तेव्हाच  ती मोकळी जागा विरोधी पक्ष म्हणजे भाजपा , शिवसेना  २०१४ मध्ये व्यापू शकले व सत्ताधारी बनले । देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले। 

ते "माणूस " चित्रपटातील  गीत आहे ना , फड़णवीसांची कारकीर्द अगदी तशीच आहे। 

" मन सुद्ध तुझ गोस्त हाय पृथिविमोलाची। 
तू चाल पुढे तुला रे गड्या भीति कश्याची , 
पर्वा भी कुणाची।

त्याप्रमाणे फड़णवीसांकडे राज्य चालविण्याची जबाबदारी आली होती।  गड़ी पण भलताच तयारीचा निघाला।  त्याने  रस्ते , पायाभूत सुविधा , शहरी सार्वजनिक वाहतूक प्रश्न मार्गी लावण्यासाठी "मेट्रो  योजना " या बरोबरीने "दुष्काळ , शेतकरी  आत्महत्या " अशा प्रश्नाच्या मुळाशी असलेले कारण नष्ट करण्यासाठी "जलयुक्त शिवार ", "सिंचन प्रकल्प  ", " पीक विमा " अश्या योजना या  दोन्ही आघाड्यांवर किल्ला यशश्वी लढविला। 

"झेंडा भल्या कामाचा जो घेउनि निघाला। 
काटकूट वाट मधि बोचति त्याला 
रगत निगल , तरी बी हसल , शाबाश तेचि। "

राज्य कारभार करताना अनेक आव्हाने  त्यांच्या समोर होती।  वाटेत काटे टाकण्याचा प्रयत्न कधी स्वकीयांंनी केला कधी विरोधकांनी।  मग तो  " ना णार प्रकल्प" असेल, " समृद्धि महामार्ग & त्यावर होणारे लॉजिस्टिक & प्रोसेसिंग पार्क "असेल   किंवा " मराठा मोर्चा अणि मराठा समाजसाठीच्या आरक्षणाचा विषय असेल " फडणवीस सरकारला घेरण्याचा प्रयत्न खुप झाला।  पण संयम राखत समाजातील सर्व घटकांशी संवाद साधत , हसत खेळत कधी चिमटे काढत गंभीर प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। 

"जो वळखितसे औक्ष म्हंजी मोटि लडाई
अन्‌ हत्याराचं फुलावानी घाव बि खाई
गळ्यामंदी पडंल त्येच्या माळ इजयाची"

जलयुक्त शिवार, मुंबई मेट्रो , मराठवाड़ा अणि आसपासच्या भागातील दुष्काळ नाहीसा करण्यासाठी नदीजोड़ किंवा धरण जोड़ प्रकल्पा सारख्या मूलभूत पर्यायांचा विचार , मराठा आरक्षण अश्या " Must Win Battle " ओळखणे अणि आपली उत्तम टीम त्या कामासाठी वापरणे अणि त्यांना पूर्ण सहकार्य करणे  हे नेता म्हणून फड़णवीसांचे मोठे वैशिष्ट।  त्यासाठी होणारा विरोध , कोर्टाच्या वाऱ्या , काही विशिष्ट लोकांकडून होणारी अड काठी यावर सकारात्मक पद्धतीने मात करणे ही त्यांची शैली। " समृद्धि महामार्ग & त्यावर होणारे लॉजिस्टिक & प्रोसेसिंग पार्क " हा रोजगार निर्मितीसाठी एक मैलाचा दगड ठरु शकेल। 


आता हे सर्व केल्यानंतर "या गड्याच्या गळ्यात विजयाची माळ पुन्हा पडणार  का  " हे मतदार २१ ला ठरवतील , पण कदाचित हीच ती वेळ ज्यावेळी महाराष्ट्राचे राजकारण कूस बदलेल अणि "सहकार महर्षी " ते " मेट्रोमॅन" असा नेतृत्वाचा प्रवास कायमस्वरूपी झालेला दिसेल। 

चला तर मग २१ ऑक्टोबर ला मतदान करुया अणि भागीदार होऊया बदलता महाराष्ट्र व नेता  घडविण्यासाठी !





  प्रमुख  वक्ते : डॉ अजित वामन आपटे  शिक्षण :   B.A , M.P.M , D.M.M ,D.I.T.M , P.H.D (छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापनशैलीचा चिकित्सक ...