Saturday 25 September 2021


 

इतिहास अभी जिंदा है ?

मागील महिन्यात Disney Hot star या OTT प्लॅटफॉर्मवर "मुघल एम्पायर" या वेब सिरीज चा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यासंदर्भात प्रसिद्ध दिग्दर्शक कबीर खान यांची प्रतिक्रिया चांगलीच गाजली. वर्षानुवर्षे मुगल राजवटीचे "जुलमी राजवट" असे वर्णन केले गेल्याने कबीर खान यांना अतीव दुःख झाले. वर्षानुवर्षे "आक्रमक; इस्लामचा जबरदस्तीने प्रचार आणि प्रसार करणारे व क्रूरकर्मा" अशी  कल्पोकल्पित(?)  प्रतिमा समाजामध्ये मुघल साम्राज्याची तयार झालीआहे तिला छेद देण्याचे काम यासारख्या मालिका करतील असे त्यांना वाटते. 

मुघल शासक "लुटारू" नव्हे तर "राष्ट्र निर्मितीचे आद्य पुरस्कर्ते" कसे होते या गोष्टी अशा मालिका समोर आणतील आणि चालू असलेल्या अपप्रचाराला सडेतोड उत्तर देतील असे अकलेचे तारे या कबीर वाणीतून उद्गारले गेले.  मालिकेशी संबंधित निखिल अडवाणी; मिताक्षाकुमार यांनी सुद्धा अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया दिल्या.  रुदरफोर्ड यांच्या "एम्पायर ऑफ मुगल" या पुस्तकाचा संदर्भ देत आपल्या मूर्खपणाला तत्त्वाचा मुलामा वगैरे द्यायचा प्रयत्नही केला.

 दुसरीकडे  उत्तर प्रदेशात होऊ घातलेल्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापले  आहे. आमच्या सरकारच्या काळात 'सरकारी योजनांचा लाभ' हा सर्वापर्यंत देण्यात येत आहे हे अधोरेखित करताना पूर्वी फक्त "अब्बाजानचे चोचले" पुरवले जायचे हे सांगायला योगी आदित्यनाथ विसरले नाहीत .साहजिकच यावर मोठे काहूर उठले. पुरोगामी मंडळी तर यावर तुटून पडली. पुरोगाम्यांचे महामहोपाध्याय करण थापर साहेब यांनी तर थेट तालिबान्यांच्या प्रवक्त्याच्या  वक्तव्याचा दाखला दिला आणि म्हणाले "भारतातील मुस्लिमांच्या न्याय हक्काचे संरक्षण झाले पाहिजे व त्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे".  हे तालिबानी पुढार्‍याने आम्हाला सांगावे आणि तेव्हा त्याला दोन शब्द सुनावण्याऐवजी थापर साहेब उजव्या विचारसरणीच्या पक्षांना सल्ले देतात. खरोखरच अद्भुत!

अशा या पुरोगामी म्हणणाऱ्या मंडळींशी  संघर्ष जरा कठीण असतो कारण एक तर ही अत्यंत बुद्धिमान असतात .त्यांच्या भाषणाच्या जोरावर 'पाहिजे असलेला संदर्भ ;विचार उचलून( अत्यंत शिताफीने नकोस असलेला भाग वगळून) एक narrative हे लोक तयार करतात. अर्धसत्य आणि रेटून बोलणे या जोरावर हाच narrative हे अंतिम सत्य आहे हे ठसवण्याचा जोरदार प्रयत्न करतात

याची काही उदाहरणे खाली देत आहे

1. मुघल शासकांनी हिंदूंची देवळे काही जाणून बुजून पाडली नाही तर युद्धाच्या धामधूमीत; तोफ गोळ्यांच्या वर्षावात कधीकधी ती पडली. मंदिराची लूट म्हणाल तर ती राजकीय हेतूने किंवा कब्जा केलेल्या भूभागाची आर्थिक घडी वैगरे बसवण्यासाठी केली गेली( यालाच कबीर खान "Nation Building" वगैरे म्हणत असावा).
2. बाबरनाम्यामध्ये अयोध्येत राम मंदिर पाडून बाबरी मशीद बांधली याचा उल्लेखच नाही त्यामुळे अशा कल्पोकल्पित गोष्टींनी पूर्ण मुस्लिम समाजास वेठीस धरण्यात काही अर्थ आहे.
3.  तैमुर लंगने भारतावर स्वारी केली ;लोकांची कत्तल केली ती साम्राज्यविस्तार किंवा लुटीच्या हेतूनेच होती. इस्लामी राजवट स्थापन करण्याचा वगैरे त्याचा काही हेतू नव्हता.
4. शिवराज्याभिषेक दिनाला "हिंदू साम्राज्य दिन " म्हणायचं नाही कारण  म्हणे शिवरायांनी  जे धर्मनिरपेक्ष राज्य स्थापन केले त्याचा अवमान करण्यासारखे आहे कारण या मंडळींच्या मते शिवरायांचे स्वराज्य त्यांच्या सैन्यातील 70 टक्के मुस्लिम यांच्या पाठिंब्यावर पण अवलंबून होते. 
5.  "शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला" हा लहानपणापासून पाठ्यपुस्तकात शिकलेला इतिहास आता मात्र पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यासाठी या पुरोगामी मंडळींना हरकत आहे कारण "कोथळा बाहेर काढणे वगैरे हिंसक भाषा काही लोकांच्या भावना दुखावते ". अशी भाषा अफजलखानासारख्या सूफी संताबद्दल काढणे आपल्या धर्मनिरपेक्ष भारतात कसे खपवून घेतले जाईल.
6. औरंगजेबासारखा मुघल शासक अत्यंत श्रद्धाळू मुसलमान होता; टोप्या शिवून त्या विकून आलेल्या पैशातून आपला उदरनिर्वाह चालवायचा . तो क्रूरकर्मा थोडीच असेल.
7. कलम 370 रद्द झाल्यानंतर केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात जी बंधने लागली आहेत त्यामुळे काश्मीर खोऱ्यातील (मुस्लिम बहुल भाग) लोकांच्या मानवी अधिकारांवर गदा येते आहे.
8. 'गजवा ए हिन्द' मध्ये भारतातील मुसलमानांची संख्या वाढवून भारतात इस्लामी राज्य स्थापन होईल हा  उजव्या विचारसरणीच्या लोकांनी निर्माण केलेला भयगंड आहे.
9. केरळातील मलबार भागात (ज्या भागातील  वायनाड मधून राहुल गांधी निवडून येतात) 1920 -21 आली जे मोपल्यांचे बंड झाले(ज्याला यावर्षी 100 वर्षे पूर्ण झाली) त्यामध्ये बऱ्याच हिंदूंची कत्तल करण्यात आली त्याला या लोकांनी "वर्ग वादाचा लढा "असे नाव दिले. हिंदूंची कत्तल हे "Collateral Damage"  होते . 

या सगळ्यात घाला कशावर घातला जात असेल तर तो "इतिहासावर". 

इतिहास म्हणजे "जसे आहे किंवा होते तसे " म्हणजे आजच्या भाषेत "फॅक्च्युअल रिप्रेझेंटेशन ऑफ इव्हेंट". आजकाल त्यामध्ये थोडा बदल करून असे म्हणावे लागेल की "इतिहास म्हणजे मी सांगेन तो" किंवा "मला कळेल तो" किंवा "मला पूरक असेल तो" अशी काहीशी गंमत झाली आहे. 'भावना' आणि 'अस्मिता' या दोन भगिनींनी  उच्छाद मांडला आहे. छोट्या छोट्या गोष्टींवर या दोघी  भगिनी दुखावतात आणि उगाचच वितंडवाद निर्माण होतो.

अर्थातच खरा इतिहास मांडण्यासाठी "reason over rhetoric" हा approach वापरणे संयुक्तिक ठरणार आहे. कारण फक्त rhetoric मूळे  उजव्या विचारसरणीच्या लोकांना हे लोक "fringe element" ठरवून मोकळे होतात आणि आपण त्यांच्या हातात कोलीत दिल्यासारखे होते.

या पुरोगाम्यांच्या बुद्धिभेदाला उत्तर द्यायचे असेल तर खालील मांडणी करणे गरजेचे आहे

1.  "हिंदू मंदिरे ही राजकीय आणि युद्ध धामधुमीत पाडली गेली आणि त्याची लूट राजनैतिक स्वरूपाची होती" हे सांगताना 'त्यातील मूर्ती का फोडल्या गेल्या' किंवा' मशिदीसमोर दगड म्हणून का टाकल्या गेला 'हा भाग सविस्तर वगळला जातो.'हिंदू पुरुषांची कत्तल' किंवा 'मुंडक्यांचे मनोरे रचणे' हा भाग रक्तरंजित असल्याने हळुवार पुरोगामी मनाला त्याचा त्रास होत असावा.  

काफीर किंवा हिंदू स्त्रिया या बकऱ्यांपेक्षा अधिक लायकीच्या नाहीत त्यामुळे 'त्यांना विकून  टाकणे';  'त्यांच्यावर अत्याचार करणे' किंवा 'त्यांना भर दरबारात नाचायला ठेवणे' व नंतर 'जनानखान्यात भरती करणे' यामध्ये स्त्रीवादी पुरोगाम्यांना देखील  मानवाधिकार वगैरे भानगडी दिसत नाहीत कारण "अमन की आशा" च्या 'म्युझिक ओपेरा' मध्ये हा ऐतिहासिक आक्रोश थोडाच त्याच्या कानावर पडणार आहे.  मिताक्षाकुमार यांना देखील हे माहित आहे कारण सध्या समाजात झालेल्या स्त्रियांवरील अत्याचारकडे आपले लक्ष वेधून ही नेहमीच कसे चालू आहे असे "normalization"करण्याचा प्रयत्न  त्या करतात.
2.  काश्मिरी लोकांच्या मानवाधिकार बद्दल गळा  काढणारे लोक 90 च्या दशकात काश्मिरी पंडितांना रातोरात जेव्हा खोऱ्यातून हाकलले गेले; " तुमच्या मुली,बायका घरी ठेऊन तुम्ही निघून जा" अशी पोस्टर लावली गेली आणि "पंडितोंके बिना पंडितायोंके साथ चलो बनाये पाकिस्तान" चा नारा दिला गेला तेंव्हा "भाईचारा" नामक मिठाई खाण्यात पुरोगामी गर्क होते.
3. अफजल खान हा छत्रपती शिवरायांचा जर राजकीय वैरी होता तर त्याने तुळजापूर आणि पंढरपूरची देवळे का फोडली? सूफी परंपरेतला हा कनवाळू संत इतका क्रूर का वागला?  कारण तसे असते तर  अदिलशाहशी लढताना युद्ध धामधुमीत मशीद पाडल्याचे काही संदर्भ पण मिळाले असते . असे प्रश्न विचारले की अस्मिता आणि भावना दोन्ही दुखवितात.
4. शिवाजी महाराजांच्या दरबारात administrative कामासाठी असलेले सात-आठ मुसलमान जर यांना 70% वाटत असतील तर बोलणेच खुंटले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याचा उल्लेखही स्वतःच्या फायद्यासाठी धर्मनिरपेक्ष पद्धतीने  (मुस्लीम तुष्टीकरण) करायला ही मंडळी धजावतात.
5.  बाबरनामा किंवा आलमगिरी मध्ये किती सनम खाने (सनम म्हणजे मूर्ती आणि खाने म्हणजे गृह) किंवा बुत खाने (बुत म्हणजे मूर्ती आणि खाने म्हणजे गृह) उध्वस्त केले व मशिदी उभारल्या याच्या नोंदी आहे त्याकडे डोळस नजरेने दुर्लक्ष करायचे  आणि बाबर नाम्याची "अ योध्येत मशीद उभारली गेली त्या काळातील पानेच गायब आहेत' हा भाग मुद्दामून दडपून ठेवायचा.

 त्यामुळे कबीर खान; भावा खरच बोललास.  "इतिहासाचे अवलोकन" हे पुरावे व ऐतिहासिक संदर्भाला धरूनच झाले पाहिजे. आपल्याला नको असलेले संदर्भ वगळून नव्हे.

रात्र वैऱ्याची आहे पण इतिहास अभी जिंदा है!

  प्रमुख  वक्ते : डॉ अजित वामन आपटे  शिक्षण :   B.A , M.P.M , D.M.M ,D.I.T.M , P.H.D (छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापनशैलीचा चिकित्सक ...