Saturday 14 December 2019

                                                   नित्यानंद  अणि नामस्मरणाचा रोग 

गेल्या दोन -तीन आठवड्यामध्ये  कुठल्याही संवेदनशील माणसाच्या काळजाचा ठोका चुकविणाऱ्या  घटना घडल्या।  एक होती हैदराबाद मध्ये झालेल्या डॉक्टर तरुणीच्या बलात्कार अणि हत्येची।  महिला सबलीकरणाच्या काळात  अशा  घटना चीड़ निर्माण करतात अणि त्यामुळे साहजिकच हैदराबाद पोलिसांनी ज्या तत्परतेने आरोपींचे एनकाउंटर( मानवाधिकार वैगरे आचरट कल्पनांना भीक न घालता) केले ते निश्चितच कौतुकास्पद।  दूसरी अणि तितकीच महत्वाची बातमी म्हणजे " ए राजशेखरन " या नावाच्या माणसाने इक्वाडोर किंवा केमन आइलैंड च्या दरम्यान असलेले एक बेट (island ) विकत घेऊन स्थापन  केलेला छोटा देश (micronation ) म्हणजेच "कैलास ". ज्याला स्व:तचे   मंत्रिमंडळ (कॅबिनेट ) , पंतप्रधान आहे अणि  या राष्ट्राचा स्व:तचा ध्वज असून  जगातील सर्व  हिंदू लोकांसाठी (जाती पाती विरहित )  ज्यांचा धार्मिक आस्था विशिष्ट असल्यामुळे जगभरात छळ (percecuated) होतो आहे त्यांना  सुखाने आपल्या धर्माचे पालन करता यावे म्हणून स्व:तला  शिवभक्त (shaivite ) म्हणवणाऱ्या लोकांनी  चालू केलेले राष्ट्र। "

भारत हा देश सेक्युलरच (?) आहे की त्याची वाटचाल हिन्दू राष्ट्राच्या मार्गाने चालली आहे यावर प्राइम टाइम चर्चा झड़त असताना  जगात निर्माण झालेले  हे पहिलेच छोटे हिन्दू राष्ट्र(micronation )।  ज्या Citizen Amendment Bill " च्या माध्यमातून भारत सरकार शेजारी देशातील माइनॉरिटीला  सामावून  घेण्यासाठी असेच काहीसे करू इच्छित आहे, तसाच हा  प्रकार।  आता तुम्ही म्हणाल या दुसऱ्या बातमीचा पहिल्या हैदराबादवाल्या बातमीशी काय संबंध।  

निश्चितच आहे तो असा :

"ए राजशेखरन" हा ४२ वर्षीय माणूस दूसरा तिसरा कोणी नसून बलात्कार अणि लहान मुलांचे शोषण अशा गंभीर गुन्हांमध्ये  अटक वारंट असलेला "स्वामी नित्यानंद ". 'नित्यानंद ध्यानपीठ' च्या नावाखाली  आपले धार्मिक दूकान थाटलेला  स्व:तला शिवभक्त वैगरे म्हणवणारा श्रीमंत भोगी।  यातील गंमत पहा ज्या शिवभक्तीच्या नावाने याने आपले दूकान थाटले अणि जो मूळचा कैलासवासी ( Original Kailasaite  ) आहे तो शंकर सुखी स्थिर सांसारिक जीवनपेक्षा  भणंगपणताच (Wanderer's Life )  रमणारा व खऱ्या अर्थाने " विध्वंस अणि  निर्मिति " च्या खेळाचा सूत्रधार।  त्याचा हा तथाकथिक भक्त म्हणजे  योग्याच्या वेशातील  राक्षसच।  त्याची प्रवचने म्हणजे आचरट पणाचा कळसच।  तर काय  म्हणे याच्या कड़े एवढी आध्यात्मिक शक्ती आहे की  तो " सूर्योदय ४० मिनिटे उशिरा करू शकतो " किंवा " गाय किंवा इतर पशुंना संस्कृत अणि तमिळ मध्ये  बोलायला लावू शकतो " किंवा " त्याच्या ८२ (अंध)भक्तांना  त्याने तिसरा डोळा उघडून जग दाखविले ". या सर्वांवर  कड़ी म्हणजे  नोबल पारितोषिक विजेता Einstein  कसा चूक आहे आणि physics  हा विषय त्याला कसा कळला नाही   यावरचे  विवेचन।   


आता तुम्ही म्हणाल असल्या वेड्याच्या मागे कोण लागेल , तर तो तुमचा गैरसमज ठरेल।  सामान्य गरजू लोकांपासून ते  सिनेअभिनेती  (Actress ) ,राजकीय पुढाऱ्यांपर्यंत बरेच लोक याचे भक्त।  तसे  पाहिले तर धार्मिक दुकानदारीचे एक नवे बिज़नेस मॉडेलच अलीकडे तयार झाले आहे। सुरवातीला  प्रवचने , जत्रा मेळावे या माध्यमातून  साध्या भोळ्या भाबड्या  धार्मिक लोकांमध्ये आपले बस्तान बसवायचे।  अन्नछत्र , जमलेच  तर शाळा , रुग्णवाहिका , हॉस्पिटल्स  अशा सामान्य माणसाच्या निकडीच्या सोयीसुविधा अल्पदरात  किंवा फुकटात  देऊन ते अधिक दॄढ करायचे।  एकदा का गर्दी जमायला लागली की तिथे " गर्दी तिथे पुढारी " या न्यायाने नेता नावाची जी जमात आहे ती प्रकट होते , मग त्या परोपकारी (?) लोकप्रिय  बाबाला राजाश्रय मिळतो।  Glamour  च्या जगात असणारी स्पर्धा किंवा relevant  राहण्यासाठीची धडपड तिथे काम करणाऱ्या लोकांना सतत तणावाखाली ठेवते , त्यातून येणारी असुरक्षितता , व्यसनाधीनता , एकटेपणा किंवा आपल्या आयुष्याचा 'अर्थच काय'  पर्यन्त गेलेली  टोकाची निराशा यावर  " जीवनाचा  खरा अर्थ " समजावून सांगण्याच्या  गोंडस नावाखाली नवनवीन आध्यात्मिक गुरुंची गरज पडतेच ,मग लोकाश्रय मिळालेले बाबा  लोक ती जागा घेतात अणि सुरु होतो एक पंचतारांकित आध्यात्मिक प्रवास।  मग हे लोक देशोदेशींच्या लोकांच्या "Enlightenment " साठी " इंग्लिश "मधून अध्यात्म पाजळतात। त्यांचे हे पंचतारांकित भक्त लोक मदिराक्षीच्या संगतीत बाबा कसे ग्रेट आहेत अणि त्यांनी साध्या भाषेत कसे "Enlight " केले असे "lightening speed " मध्ये बरळतात।  याचाच पुढील टप्पा म्हणजे अशा देशी विदेशी भक्तांचे होणारे शोषण , कधी ते भोळ्या भक्तीचे आड़ केले जाते तर कधी "Enlightenment With   Master  Programme " च्या नावाखाली "Contractual  agreement " वैगरे करून रीतसर होते , बर इतर वेळी "Hotel चा Feedback  Form " पण कर्तत्व कठोर पणे भरणारा माणूस बाबांवरच्या (अंध)विश्वासपायी काहीही न वाचता  तो फॉर्म भरून सही करून मोकळा होतो अणि पश्चतापाच्या बंधनात अडकतो। कधी तो बाबा "आसाराम "असतो , कधी "बाबा राम रहीम " असतो, तर कधी " नित्यानंद "असतो।  नावे वेगवेगळी , भक्तीच्या नावाखाली दुकाने चालविण्याचा धंदा सारखाच।


हे सर्व पाहिल्यावर साहजिकच प्रश्न पडतो की पुन्हा पुन्हा फसवणूक होऊन देखील दर खेपेला नव्या बाबाला नमन करण्यासाठी आपण पुढे का असतो याचे सोपे उत्तर म्हणजे "आपला नामस्मरणाचा रोग ". ताणतणाव अणि संकटांनी भरलेल्या आयुष्यात विसाव्यासाठी , आपल्या पाठीमागे कोणी आहे  असा विश्वास देणारे कोणी तरी असावे असे वाटणे चुकीचे नक्कीच नाही। "पांडुरंगी दॄढ भावो " या तत्त्वा प्रमाणे तो आधार "देव " नावाच्या संकल्पनेमध्ये पाहणे हे स्वाभाविक आहे , तिथे पोचण्याचा मार्ग म्हणजे भक्ति / नामस्मरण/सेवा इ।  Action(कृति ) पेक्षा Attention ( देव पाहून घेईल) वर  भरोसा  असलेला असा भाबडा भाविक  म्हणजे त्या मार्गावरून देवभेटीचा अनुभव  किंवा जीवनाचा अर्थ वैगरे समजून देऊ म्हणणाऱ्या  बाबा लोकांचा "Target audience " असतो।  मग हे भूतलावरील देव स्व:तलाच Almighty वैगरे  समजून  शोषणाला सुरवात करतात।

तसेही आपल्याकडे थोर माणसांना "देवत्त्वाच्या" चौकटीत बसविण्याचा प्रयत्न कायमच होत राहिलेला आहे कारण या चतुर लोकांना  पक्की कल्पना आहे की एकदा का एखाद्या माणसाला देव केले की "विचारांच्या सामर्थ्यावर  होणारे मूल्यमापन मागे पडून भक्तीच्या वाटेने  केले जाणारे गुणगान "चालू  होते। भक्तीचा राग विचारांच्या लढाईत जिंकून नेतो। कृतीपेक्षा चमत्काराचे "Attraction " त्यात भर घालते।

म्हणजे बघा
  • ज्या "भिक्षुकशाहीच्या विरोधात " महात्मा फुल्यांनी आवाज उठवला  त्यांची जयंती किंवा पुण्यथिति "सत्यनारायण "घालून , "फोटोची पूजा" करून  अणि " प्रसादाच्या जेवणावळी घालून " साजरा करण्यासारखे त्यांच्या विचाराचा पराभव तो कुठला। 
  • "रेड्याच्या तोंडून वेद म्हणून घेतले " किंवा " भिंत चालवून दाखविली " असल्या चमत्कारातच ज्ञानेश्वरांचे मोठेपण आहे असे मानणाऱ्या किती लोकांनी   "पसायदान " किंवा "ज्ञानेश्वरी "समजण्याचा प्रयत्न केलेला असतो। 
  • "कागदी लिहिता नामाची साखर /चाटिता मधुर गोदी नेदि। " असे "Practical "अभंग लिहणाऱ्या तुकोबांचे भक्त "पाण्डुरंगाचे"  लाख लाख वेळेला नाव लिहा म्हणजे अमुक  गोष्टी होतील , संकटे दूर होतील असे म्हणतात तेव्हा हसावे की रडावे हे कळेनासे होते। 
  • पुरोगामी अणि सेक्युलर म्हणणारे लोक सावरकरांचा द्वेष करतात , पण " गाय ही केवळ उपयुक्त पशु आहे " किंवा "शेण अणि मलमूत्र यांच्या सहवासात गोठ्या मध्ये राहणाऱ्या गाईची पूजा सोवळे पा ळून, शुचिर्भूत झालेल्या बाईने  का करावी " किंवा " ज्ञानेश्वरांनी जर भिंत चालवली असेल तर अलाउद्दीन खिल्जीच्या सैनिकांना त्यांना  का रोखता आले नाही " या असल्या  त्यांच्या प्रश्नांवर भले भले पुरोगामी प्रतिगामी होतात।   
  • शिवाजीचा उल्लेख करताना "छत्रपती शिवाजी महाराज "असाच झाला पाहिजे असे आग्रहाने  सांगत फिरणारे राज्यकर्ते  जातिपातीचे राजकारण करण्यात इतके गुंतलेले आहेत की " रयतेचा उद्धार " किंवा " बहुत जनाचा आधार " असल्या   भानगडित न पडता "मराठा " तितुका मेळवावा  म्हणताना कुठला "महाराष्ट्र धर्म " जाणतात हे सर्वांना ठाऊक आहे त्यामुळे चांगले काम करणाऱ्या  माजी मुख्यमंत्राची जात महत्वाची ठरते काम नव्हे। 
थोडक्यात काय तर विचार अणि आचार या मध्ये समन्वय साधणे बऱ्याच लोकांना शक्य नसते तेव्हा  देवत्त्वाची चौकट अणि नामस्मरणची सजावट जगणे सोपे करते।

आता तुम्ही म्हणाल  सध्याच्या जागतीकरणाच्या  युगात देखील "नामस्मरण " जरूरीचे ठरते का किंवा "सेक्स पासून संस्कारा पर्यन्त"  खुल्लम खुल्ला चर्चा करणारी पिढी याच्या आहारी  कितपत जाईल।  त्याचे उत्तर " VUCA " या  concept मध्ये आहे।  Vulnerability , Uncertainty , Complexity  अणि  Ambiguity या  चार गोष्टींनी आपले जग व्यापलेले आहे।   संसाधने (Resources) &तंत्रज्ञान (Technology), संधी (Opportunities ) यांची असणारी  मुबलक उपलब्धता, जगण्याची स्पर्धा (Competition)  पण तितकीच तीव्र करत आहे.  " दोन पंच अणि लंच " किंवा " दोन  सह्या अणि वह्या " असे असणारे जॉबचे स्वरुप बदलून सतत नविन नविन स्किल आत्मसात करताना लागणारी गतिशीलता (Pace of life) ठेवताना  होणारी दमछाक  प्रत्येक तरुणाला किंवा तरुणीला विसावा शोधायला भाग पाडते। तो विसावा बहुतेकदा " नामस्मरणच " असते। 

यातून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता  तर  म्हणजे " स्व:ची ओळख " अणि त्यासाठी केलेला प्रवास। व "एकमेका सहाय्य करुँ। अवघे धरु सुपंथ। " असे  म्हणत  चालणारे "participative" समाजजीवन  पुन्हा अनुभवणे  जे आपण  मागे  सोडून   " जीवो जीवस्य जीवनम :" ( one living is food for another) हा  जंगलाचा कायदयाचे  पालनकर्ते झालो आहोत। 

ज्यांना या पुराणातील गोष्टी  वाटतील  त्यांनी  आंतरराष्ट्रीय  पातळीवर सध्या जोरात असणारे "इकीगाई"  हे जापनीज (Japanese ) तत्वज्ञान जरूर वाचावे। आनंदी अणि तणावमुक्त जीवनासाठी  ज्याची सर्वात जास्त गरज आहे ते म्हणजे " आपला इकीगाई " शोधण्याची  म्हणजे काय तेच  " तू स्व :त ला ओळख अणि सर्वांशी प्रेमाने बंधुभावाने वाग "

थोडक्यात काय "बाबा नित्यानंदाच्या " भाषेत बोलायचे झाले तर " नामस्मरणाच्या आज़ारातून  बरे होण्यासाठी वरचा उपाय म्हणजे " Breath of Solution " आहे , "Depth  of solution " कळण्यासाठी चला निघुया प्रवासाला "स्व:तला ओळखायला। "








Saturday 7 December 2019

                                                               पाहता समाज 

२०१९ हे वर्ष सरत आलेले असल्याने अणि "Thanksgiving" चे सोपस्कार झाल्यानंतर  मागच्या आठवड्यामध्ये ऑफिसमध्ये  जरा  निवांत वातावरण  अनुभवायला मिळाले।   २०२० साठी बाह्या सरसाहून कामाला जुंपणापूर्वी  "Enjoy The Festivity " किंवा " Spend Time With your Family " च्या गोंडस नावाखाली मिळालेले काही विसाव्याचे क्षण  अणि त्याबरोबर येणारे खुमासदार "Canteen  Sessions ". जिथे संवाद हा  समोर असलेल्या माणसाला "headcount " समजून  केलेला नसून तो जीवनातील सहयात्री (Companion) म्हणून केला जातो अणि मग  एक मस्त मैफिल जमून जाते।  असाच योग मागील आठवड्यामध्ये आला।  कुणी जानेवारी मधील  मुंबई मॅरेथॉनची तयारी वर बोलत होते तर कुणी "kick boxing " मध्ये किती लाथा खाल्ल्या याचे सहभिनय वर्णन करत होते।  कुणी  नुकत्याच केलेल्या ट्रेकिंगची हकिगत सांगून समोरच्या अंगावर रोमांच उभे करत होते। तर माझ्यासारखे बैठ्या प्रवृतीचे लोक काय नवीन वाचले किंवा कुठले नवीन पुस्तक "स्टोरीटेल App " वर ऐकले ते सांगत होते। तेवढ्यात चेहऱ्यावर कुतूहल अणि आश्चर्य याच्या मिश्रणातून होणारे भाव दाखवत एका सहकाऱ्याने प्रश्न केला "तू वाचतोस ? "वाचन कला किंवा वाचणारा समाज हीच एक दुर्मिळ गोष्ट होत चालली आहे  त्यामुळे प्रश्र काही अगदीच चुकीचा नव्हता। 

माणसाला मनुष्यप्राणी असे पण म्हटले जाते कारण भय ,भूक ,भीती, तहान या भावना माणसामध्ये सुद्धा प्राण्यांप्रमाणे असतात  त्याला मनुष्य बनविण्याचे काम करते  त्याचे कुतूहल। कुतूहल नावाचे हे रसायन अजब आहे जे  त्याला  एखाद्या गोष्टीचा शोध घ्यायला भाग पाडते , त्याचा पाठपुरावा करायला लावते।  अडखळणे , धडपडणे , यश , अपयश , एखादी गोष्ट सापडण्याचा आनंद किंवा अपेक्षाभंगाचे दु :ख  अशा सर्व भाव भावनांनी  संपन्न जीवनानुभव  ( Life Experience)घ्यायला भाग पाडते।  या भावनेतून आचार विचार , भाषा , धर्म , राजनैतिक जाणिवा  अश्या प्रवृत्तीचे दुवे जोडले जातात  ज्यातून काही बंधने स्वखुशीने स्वीकारून राष्ट्र नावाची गोष्ट आकार घेते। राष्ट्रीय अस्मिता निर्माण होते।आपल्या जगण्याला विशेष अर्थ आहे हे दाखविणारे  सांस्कृतिक विकासाचे टप्पे गाठते।  साहित्य , कला निर्मिति होते , ज्यातून जगण्याच्या प्रेरणेची माहिती मिळते।  हे कुतूहल शमविण्यासाठी , आणि संपन्न जीवनानुभव  अनुभवण्यासाठी  साधन असते ते म्हणजे " वाचन " & ते उपलब्ध व्हायचे " पुस्तकातून " अणि म्हणून "शहाणे " होण्याचा एकमेव मार्ग हा शिक्षण अणि पर्यायाने "वाचन " ही गेल्या काही शतकांची मळलेली  वाटच म्हणा ना।

त्यातूनच  मग "वाचाल तर वाचाल " किंवा " चार बूके शिकलास तर काय लै शहाणा झालास हो " या सारखे उपदेश किंवा सुसंवाद आपल्या परिचयाचे आहेत।  वाचनातून  ज्ञान मिळते, गोष्टी समजतात  हे आपल्या मनावर इतके बिंबले आहे  की एखाद्या माणसाबद्दल  मत व्यक्त करताना  आपण सहज म्हणून जातो की "माझे त्या माणसाबद्दलचे "Reading " अमुक अमुक आहे।  समृद्ध  जीवनासाठी  लक्ष्मी (पैसा ) बरोबर सरस्वतीची (ज्ञान, पुस्तके ) उपासना पण तितकीच गरजेची आहे  हे किती जरी ठासून सांगितले तरी प्रत्यक्ष वास्तविकता ही काहीशी वेगळी आहे। लक्ष्मीपुत्रांची  समृद्धी( ;यश , कीर्ति , पैसा ) मिळविण्यासाठी चाललेली स्पर्धा ही मोजून मापून केलेल्या सरस्वती पूजनावर आधारित आहे। "अपेक्षित प्रश्न संच ","वर्गातील सहकाऱ्याच्या नोट्स ", ऑफिस मधील प्रेजेंटेशन साठी बनविले जाणारे "Talking Points"  ही आपण सर्वांनी अनुभवलेली मोजून मापून सरस्वती पूजनाची काही ठळक उदाहरणे। खरे म्हणजे आपल्यापैकी बहुतेकाना "वाचन " या गोष्टीचा प्रचंड कंटाळा असतो।  आपला देश जसा क्रिकेट खेळण्याबरोबरच  " बघणारा किंवा बोलणारा" पण देश आहे तसेच  वाचन " जरुरी है "म्हणत  त्याचा प्रचंड कंटाळा असणारा अणि सार्वनजिक जीवनात तो न्युनगंड लपविण्यासाठी धडपडणारा वाचनप्रेमी (?) देश आहे। अरे काल "Cross World" मध्ये  मस्त नविन पुस्तक पाहिले असे सांगणारे ८०% लोक तिथे A. C ची  थंड हवा  अणि वाफाळती कॉफ़ी  याचा आस्वाद  अधिक घेतात।   अशा पुस्तकांच्या दुकानात जर तुम्ही नजर फिरविली तर तुमच्या लक्षात येईल की खुप लोक एखादे पान वाचून इकड़े तिकडे सौंदर्य (?) न्याहाळन्यात जास्त गुंतलेले असतात।  बळेच आपण पण वाचतो हे दाखविण्याचा तो एक अट्टहासच।

अशा  परिस्थितीत  जर आपण शांतपणे या गोष्टीचा विचार केला तर  बहुदा " वाचनाला " असलेले  अवास्तव महत्त्व  आपल्या नजरेत भरल्याशिवाय राहत नाही।  आपण वाचतो म्हणजे नक्की काय तर

  • " पेपर " वाचून आजूबाजूला घडणाऱ्या घटनांची माहिती घेतो।  
  • "अग्रलेख (Editorial )" वाचून  अवतीभवती घडणाऱ्या सामाजिक , राजकीय , आर्थिक बाबींवर आपले मत बनवितो  किंवा आपला विचार त्या लेखाबरोबर तपासून पाहतो। 
  • "प्रवासवर्णन " वाचून घरबसल्या जगाच्या सफरीचा अनुभव  अणि आनंद घेतो।
  • "कथा ", "कांदबरी " किंवा " इंग्लिश वाङमयाचे भाषांतर " यातून  वेगवेगळ्या  घटना , माणसे , अनुभव , कल्पना  यांची माहिती करून घेतो 
  • "शालेय पुस्तके " वाचून  आपण विषय शिकतो अणि परीक्षेची तयारी करतो 
  • " Cooking Recipe " ची पुस्तके गृहिणींना चवदार पाककृतींची ओळख करून देतात।
  • " Online Blog" वाचन त्यातील विविधतेमुळे आकर्षित करते। 

थोडक्यात काय तर एखादा विषय समजावून सांगून त्याला अनुभवसंपन्न करण्याच्या प्रक्रियेला "वाचन " म्हणतात।

आता या स्मरणरंजनातून बाहेर पडून " जियो जी भरके " च्या दुनियेत आपण केलेला प्रवेश म्हणजे " वाचणारा समाज " ते " पाहणारा समाज " असा प्रवास आहे। आजकाल "Updated" राहण्यासाठी सकाळच्या पेपरची  वाट पहावी लागत नाही।  मिनिटा मिनिटाला येणारे ऑनलाइन अलर्टस आपल्याला सतत "alert " ठेवतात। राजकीय , सामाजिक किंवा आर्थिक घडामोडींवर  मत जाणून घेण्यासाठी आता अग्रलेख (Editorial ) बरोबरच " Cut the Clutter " सारखे १५-२० मिनीटाचे वीडियो उपलब्ध असतात किंवा "Knapilly " सारख्या app वर " एखाद्या बातमीचा "(Why/ What/ When/ How)सर्वांगाने आढावा घेतलेला असतो।  गणिताचे थेरम  पुस्तकातून पाठ करण्यापेक्षा " Byju 's लर्निंग App वर ते चित्रमय भाषेत उपलब्ध असते।  एखाद्या मुलाला काही गोष्टी कळल्या नाहीत तर त्याला समजेल अश्या वेगात तो मुद्दा समजावून देऊ शकणारे "Video on demand at our own pace" सारखे पर्याय समोर आहेत।  "Blog " वाचायचा कंटाळा आला तर blog writer चा  आपले म्हणणे सांगणारा "Video " पण आजकाल  मागणीत असतो किंबहुना "blog " च्या वाचकांपेक्षा " blog Video " पाहणाऱ्यांची संख्या जास्त आहे। " अपूर्वाइै " किंवा " जावे त्यांच्या देशा " ही पुलंची पुस्तके वाचून जग प्रवास अनुभवणारी  पिढी मागे पडून " Fox Life " / "Travel XP " पाहून , " भा डी पा " सारख्या ऑनलाइन पोर्टलवर  डोळ्यांनी घरबसल्या जग पाहणारी पिढ़ी आज मजा करत आहे। " Cooking Recipe" च्या पुस्तकाची जागा " Cooking Shows " ने घेतली आहे।

माहिती तंत्रज्ञानाने जग जवळ आणले हे खरेच पण ही जी "दृकश्राव्य (Audio visual)" क्रांति त्याने केली आहे त्याने अनुभवसंपन्न करण्याच्या प्रक्रियेतुन " वाचनाला " मागे टाकून "पाहण्याला " अग्रक्रम दिला आहे. पाहणे या शब्दाला निराळेच वलय  प्राप्त झाले आहे। कदाचित त्यामुळे आता भविष्यात " मी तुला पाहून घेईन " याचा निराळाच अर्थ निघू शकेल।

या पाहणाऱ्या समाजासाठी  रामदासांच्या भाषेत इतकेच म्हणेन :

" जे जे आपण पहावे।  ते ते दुसऱ्याशी फॉरवर्ड करावे। 
    पाहून ऐकुनि शहाणे करावे। सकळ जन। "


  प्रमुख  वक्ते : डॉ अजित वामन आपटे  शिक्षण :   B.A , M.P.M , D.M.M ,D.I.T.M , P.H.D (छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापनशैलीचा चिकित्सक ...